Responsive Ads Here

गुरुवार, २९ मार्च, २०१८

विवेकानंद आश्रमात महावीर जयंती साजरी


संपूर्ण जगाला शांती आणि त्यागाचा तसेच भूतदयेच्या माध्यमातून जगा आणि जगू दया हा मौलीक संदेश देणारे भगवान महावीर असून संपूर्ण जगात शांती आणि सहिष्णुता निर्माण व्हावी यासाठी जितेंद्रीय ठरलेल्या भगवान महावीरांची जयंती विवेकानंद आश्रमात अत्यंत भक्तीभावाने गुरुवारी (दि.२९) मार्च रोजी साजरी करण्यात आली. निष्काम कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांच्या समाधी समोरील वाटीकेत असलेल्या महावीरांच्या पुतळयाचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. सकाळी परिसरातील स्वच्छता करण्यात येवून उपस्थित भाविकांनी पूजन केले.
कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,गोविंदराव गणगणे,बेलप्पा धाडकर ज्ञानेश्वर शेगोकार,सौ.मोनिका खत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा