Responsive Ads Here

सोमवार, १२ मार्च, २०१८

हिवरा आश्रमचा जेष्ठ नागरीक बनला योगप्रचारक !


ग्रामीण भागात देतात योग शिबीराचे धडे,
 
 सेवानिवृत्ती नंतर अनेक जेष्ठ नागरीक सुटकेचा निःश्वास घेत आपले उर्वरित आयुष्य घर व नातवंडाचे संगोपन करण्यात धन्य मानतात. मात्र आज सुध्दा समाजातील अनेक जेष्ठ नागरीक सेवानिवृत्ती नंतर सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या सेवेसाठी,उत्कर्षासाठी आपले उर्वरित आयुष्य घालवितात. याचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील सेवानिवृत्त जेष्ठ नागरीक बाजीराव विठ्ठलराव इंगळे यांच्याकडे पाहल्यानंतर येतो. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या सानिध्यात त्यांना योगासने करण्याची आवड निर्माण झाली. जेष्ठ नागरीक असलेल्या नाना उर्फ बाजीराव इंगळे हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अव्याहतपणे योग व प्राणायाम प्रसार प्रसाराचे काम करीत आहे. जेष्ठ नागरीक असलेल्या बाजीराव इंगळे यांनी बुलडाणा,वाशिम,अकोला या ठिकाणी विविध योग व प्राणायाम शिबीराच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी चारशे ते पाचशेहून अधिक शिबीर घेतले आहे. आठ ते दहा हजार नागरिकांना त्यांच्या योग प्राणायाम शिबीराचा लाभ होऊन अनेकांच्या आरोग्याच्या समस्या दूर झाल्या. भारतीय योगविद्येचा प्रसारासाठी सेवानिवृत्ती नंतर पहिले प्राधान्य देत योगशिबीराच्या माध्यमातून नागरीकांना निरोगी आरोग्यासाठी योग प्राणायाम करण्याचा सल्ला देत आहे.
बाजीराव इंगळे हे मूळ सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डाचे- बालपणापासून शरीरसौष्ठवाची आवड असल्यामुळे पुढे कुस्ती खेळण्याकडे वळे.
भारतात ५००० वर्षापूर्वी सुरू झालेल्या योगपरंपराचा आता जगात मोठया प्रमाणात प्रचार झाला आहे.
योग व प्राणायामामुळे प्राण शक्ती व जीवन उर्जा नियंत्रणास मदत मिळते.

योग प्राणायामाच्या नियमीत सरावाने शरीर ,मन व आत्मा सुत्रबध्दता निर्माण होवून निरोगी आरोग्य टिकविण्यास मदत मिळते. शिबीरातील शिबीरार्थीच्या जीवनात आनंद निर्माण होवून ताणतणावाचे प्रमाण कमी होवून रोगप्रतिकार शक्तीत,सहनशक्ती वाढून आरोग्यदायी अनुभव येतो.
नाना इंगळे जेष्ठ योगप्रचारक हिवरा आश्रम 

योग प्राणायामाचे फायदे
प्रत्येकाने नियमीत योग व प्राणायामाचा सराव केल्यास शरीर व मन संतुलीत होते.योगासनाच्या सरावाने शरीर निरोगी व सदृढ होण्यास मदत होते.प्राणायामाच्या नियमीत सरावाने मनुष्याचे शरीर व मन दोन्ही संतुलित राहते. प्राणायामामुळे शरीरातील  ८० टक्के विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. प्राणायाम मुळे चयापचय सुधाररून वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने चेह-यावर तेज येते. प्राणायामामुळे पोटविकार,अपचन,गॅसेस इत्यादी दूर होतात. याशिवाय रक्तदाब सुध्दा नियंत्रित होतो.हदयमज्जासंस्था बळकट होते.फुफ्फुसे निरोगी होतात.एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा