Responsive Ads Here

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार ?

 * बारामती विधानसभा निवडणूकीकडे राज्यासह देशाचे लक्ष

लोकसभेच्या निवडणूकीमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष बारामती निकालाकडे लागले होते. आता विधानसभा निवडणूकीमध्ये मध्ये चित्र वेगळे नसल्याचे दिसून येत आहे. पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांच्या विरोधात चक्क त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार दंड थोपटण्याची शक्यता आहे.  असे झाल्यास बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते.

बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या वाहनांचा ताफा तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे.  या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता  बारामतीतून राष्ट्रवादीचे  उमेदवार अजित पवार हेच असतील हे आता स्पष्ट झालंय. 

यापूर्वी अजित पवारांनी तब्बल सहा वेळा बारामतीचं नेतृत्व केलंय आता सातव्यांदा अजित पवार  बारामतीच्या मैदानात उतरलेत. येत्या  28 तारखेला अजित पवार  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपर्यंत अजित पवारांच्या विरोधात लढणा-याचं डिपॉझिट जप्त झालंय. मात्र, बारामतीची यंदाची लढाई अजित पवारांसाठी तितकी सोपी नसणार आहे.  यंदा अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं.  मात्र मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा यांना  पराभवाचा सामना करावा लागला.  सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजारांचे लीड मिळालं होतं. 

लोकसभेला काकांनी पुतण्याला आसमान दाखवलं.  आता  विधानसभेतही काकांच्या  विरोधात पुतण्या दंड ठोकून उभा राहण्याची शक्यता असल्यानं बारामतीत लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?  

युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र असून

फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचे काम ते पाहतात.विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत.


सरकारी नोकरीची सुशिक्षतांना सुवर्णसंधी !

 ० कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये रिक्त पदांसाठी भरती 

० अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर अंतिम तारीख 

मुंबई : सुशिक्षीत तरूणांसाठी  व नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. या सरकारी नोकरी भरतीमुळे भरघोस पगाराची संधी सुशिक्षीतांना प्राप्त होणार आहे.  कर्मचारी राज्य विमा महामंडळाने रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सीनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

काय आहे वयोमर्यादा

कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. तसेच स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६९ वय असावे.

शैक्षणिक पात्रता

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/डीएनबी/ डिप्लोमा केला असावा. तर सुपर स्पेशलिस्ट पदासाठी नेफ्रोलॉजी आणि न्युरोलॉजी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

वेतन

स्पेशलिस्ट पदासाठी उमेदवारांना १ लाख २१ हजार रुपये पगार मिळणार आहे. तसेच सुपर स्पेशलिस्ट पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

ईएसआयसी भरतीमधील नोकरीसाठी लॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाणार आहे. हा इंटरव्ह्यू २९ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना २०७, दुसरा माळा, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, जयपुरस राजस्थान येथे उपस्थित राहावे लागणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी !

० सणासुदीच्या काळात ८० हजारांचा आकडा पार

मुंबई : दिवाळीचा सण काहि दिवसांवर येवून ठेपला असतांना सोन,चांदिच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशातच सध्या सणासुदीचा काळ सुरु असून या कालावधीत अनेकजण सोनं- चांदी करतात. मात्र साततत्याने वाढत चाललेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. पाहा बाजारात काय आहेत आजचे दर. 

आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५० रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर ७८ हजार १७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे २ हजार ८०० रुपयांची वाढ झाली.

दरम्यान, दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. धनतेरस, भाऊबीज या सणांच्या मुहूर्तावरही लोक सोनं खरेदी करतात. त्यामुळे सोनं चांदीच्या दरात घट होणार की दराचा उच्चांक वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


देशातील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार !

 वाराणसीमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

० मोदींच्या हस्ते ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे उद्घाटन



वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वाराणसीमध्ये बोलत असताना, देशातील एक लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. तरुणांचे कुटुंबवादामुळे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठीच आम्ही राजकारणात अशा एक लाख तरुणांना आणण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

काल दि.२० ऑक्टोंबर २०२४ रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. देशामधील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं ते म्हणाले. ज्या कटुंबामधील राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवलं जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.

पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा वाराणसी दौरा होता. आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे या भेटीदरम्यान त्यांनी उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती देखील जाणून घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही. घराणेशाहीच्या राजकारणापासून आणि भारताला जातीय मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात तरुण राजकारण आलं की, लोकशाही जास्तीत- जास्त मजबूत होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.राम मंदिराच्या उभारणीचा आपल्या भाषणात संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते. लाखो लोक आज रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असल्याचे मोदी म्हणाले. सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केलं आहे. एनडीए सरकारने कोणाचाच हक्क हिरावून घेतलेला नाही, गरिबांनासुद्धा दहा टक्के आरक्षण देण्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

उध्दव ठाकरेंनीच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे !

 अमरावती येथे काँग्रेस युवक मेळाव्यात आ.यशोमती ठाकूर यांचे विधान 


काहि दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि महायुती मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहिर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उध्दव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानामुळे मविआच्या नेत्‍यांमध्ये खदखद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र उध्दव ठाकरेंनीही मविआने जाहिर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल अस म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यानंतर आता काँग्रेसच्या आ. यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केले आहे. उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे यशोमती ठाकूर यांनी म्हटल आहे.