अमरावती येथे काँग्रेस युवक मेळाव्यात आ.यशोमती ठाकूर यांचे विधान
काहि दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित
करण्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि
महायुती मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहिर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये
उध्दव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानामुळे मविआच्या नेत्यांमध्ये
खदखद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र उध्दव ठाकरेंनीही मविआने जाहिर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या
चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल अस म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर
आता काँग्रेसच्या आ. यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केले आहे. उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री
व्हावेत असे यशोमती ठाकूर यांनी म्हटल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा