Responsive Ads Here

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कबड्डी संघाचे सुयश


येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत विद्यापीठस्तरावर यश संपादन केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धाचे आयोजन दि. ऑक्टोंबर ते ऑक्टोंबर रोजी देऊळगांव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालय येथे पार पडल्या. या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये ५६ महाविद्यालयाच्या संघानी भाग घेतला होता. सदर कबड्डी स्पर्धेमध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयातील मुलांच्या कबड्डी संघाने व्दितीय क्रमांक पटकावून विद्यापीठ स्तरावर घवघवीत यश संपादन केले. यामध्ये संघाचे कप्तान विशाल गालट,अमोल काळे,वैभव चांदणे,अनंता अंभोरे,निखील लाहे,गोकुळ बेलोकार,पवन बोरकर,शुभम अरू,रोहीत ओेहरे,वैभव इंगळे,देवेंद्र काळे,ॠषिकेश शिंदे या खेळाडूंचा समावेश होता. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कबड्डी संघाला प्रा.रवींद्र काकड यांचे मार्गदर्शन लाभले होते. या खेळाडूंचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवेयांनी अभिनंदन केले.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

वाचनातून देवत्वाच्या प्रवासास प्रारंभ !


मानव आणि इतर सजीवांच्या तुलनेत हे जग समृध्द,जीवन जगण्यास उपयुक्त आणि सुंदर करण्यासाठी मानवाने आपल्या बुध्दीचा वापर केला तर मानवेत्तर सजीवांनी सृष्टीचे सौंदर्य अबाधित राखले. मानवी जीवनाला लाभलेली उंची ही त्याला त्यांच्या जगण्याचे महत्व,जगण्याची दिशा त्याच्या सामर्थ्यांची जाणिव झाल्यावरच कळते. थोरा, मोठयांचे विचार वाचूनच जीवनाला कलाटनी मिळते. ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद, गांधी, टागोर,कबीर,मुन्शी प्रेमचंद,आंबडेकर यांनी विपुल लेखन केले. त्यामागे वाचनाची सुप्त शक्ती दडलेली होती. वाचनाने शब्द साठा तर वाढतोच, शब्दांचे अर्थ उमगायला लागले की विचारांचे महत्व कळते आणि सुविचार  हे मनाचे खाद्य असल्याचे संत साहित्याचे अभ्यासक तथा विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दैनिक सकाळशी सोमवारी ता.१४ मुलाखती दरम्यान प्रकाशझोत टाकला. दरम्यान वाचन यथार्थ जीवनाचा पथदर्शक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, केवळ पदवी पर्यंत शिक्षण घेतलेला नरेंद्र दत्तच्या बुध्दीमत्तेचा आवाका सर्व शास्त्राच्या आकलनापासून ते देश, विदेशाच्या विचारवंताच्या समृध्द करणा-या विचारांशी जोडल्या गेला ते केवळ त्यांच्या वाचनाच्या अफाट सामर्थ्यांने. संस्कृत, इंग्रजी अशा अनेक भाषांवर प्रभूत्व असलेला नरेद्र दत्त स्वामी विवेकानंद या पदापर्यंत पोहचला अखिल मानव समूहाला विचारांचा समृध्द वारसा ठेवून गेला. वाचनाने शब्द साठा तर वाढतोच, शब्दांचे अर्थ उमगायला लागले की विचारांचे महत्व कळते आणि सुविचार  हे मनाचे खाद्य आहे. जगभरात अनेक विद्वानांनी मानवी जीवन समृध्द करण्यासाठी आपल्या दृष्टीकोनातून पाहीलेले जग वाचकांपुढे ठेवले. घरातील पुस्तकांच्या कपाटाची जागा शोभेच्या वस्तुंनी घेतली. बंद पडत चालेल्या प्रकाशन संस्था,छपाई खर्चासही परवडत नसलेले वर्तमान पत्रे,साप्ताहीके आणि मासिके अधोगतीला गेलेल्या वाचन संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. आपल्या लेखनीने जग गाजविणारे लेखक सुध्दा दररोज सोशल मिडीयावर  स्वतःला न्याहळत आनंदीत होत आहेतवाचनाने खरच उमजतो का जगण्याचा अर्थ असे विचारल्यास त्याचे उत्तर होयच येते. वाचन करतांना का? कोणते? कशासाठी? हा प्रश्न विचारूनच पुस्तकांची निवड करावी. महापुरूषांच्या जीवनातील दोष काठून त्यांचे चरित्र किती ठिसूळ होते. हे स्वबुध्दीने एसी अभ्यासिकेत बसून रेखाटणारा लेखक किंवा विचारांच्या मतभेदांना हाड वैराशी जोडून उभ्या केलेल्या भिंती अधिक उंच करणारे नतद्रष्टे विचारवंत, संप्रादायाच्या नावाने संमेलने भरविणारे, विषमता उराशी बाळगून समतेचे गीत रचणारे, अभिजनांच्या रांगेत बसून कल्पनेच्या सागरात मनोसक्त डुंबणारे तथाकथित अभ्यासक यांना आपल्या वाचनातून टाळलेलेच बरे. अवघ्या जगातील दुर्जनता नष्ट होवून मानवाची सत्कर्माकडे रती वाढविण्याचे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर. कोणत्याही जीवाला झालेली इजा माझ्या मनावर वार करते असे म्हणणारे करूणासागर बुध्द रंजल्या, गांजलेल्यांना आपले म्हणणा-यातच देव शोधणारे तुकाराम नक्किच आणि नक्किच आपले इवलेशे जीवन जगण्याचा मतीतार्थ व्यापकतेकडे घेवून  जाईल. काळानुरूप हातात आलेले इलेक्ट्रानिक्स गॅजेट पुस्तकातून मांडलेल्या शब्दांवर मात करू पाहत आहे.

भौतिक प्रगती साधतांना संवेदना बोधट
भौतिक प्रगती साधतांना बोधट झालेल्या संवेदना, हातातून निसटून चाललेले मानवीमूल्य आणि बधिर झालेल्या जाणिवा या देहाच्या कुडीत कोंमबून आपल्या जगण्याला करीयर संपन्नतेकडे घेवून जाणारे दुबळे जीव केवळ वाचनाच्या अभावाने निर्माण होतात.

वाचनाने उमजतो  जगण्याचा अर्थ
वाचणासाठी चित्ताची एकाग्रता, बैठकीसाठी शारीरीक संपन्नता आकलनासाठी पंचेद्रीयांचे नियंत्रण झाल्याने शब्दबध्द केलेले विचार बुध्दीतून हदयापर्यंत पोहचातात आणि मग सुरूवात होते हदय परिर्वतनाला. हदय परिर्वतनानेच हाडामासाचा मनुष्य देह मानवातून देवत्वाच्या प्रवासाला प्रारंभ करतो. मानवाचा देव बनण्याला तिथेच सुरूवात होते. देव बनण्याचा प्रवास वाचनातून सुरू होत असेल कृतीतून संपन्न होत असेल तर चला मग वाचनाला सुरूवात करू या.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८