Responsive Ads Here

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

आश्रम जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य - संतोष गोरे

पर्यावरण सुरक्षा ही जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मानवाला जीवन देणारी व संगोपन करणारी वसुंधरा क्षतीग्रस्त होत आहे. तीला निरोगी ठेवणे आवश्यक झाले आहे. वाढती औद्योगीक प्रगती व विकासाच्या नावाने वाढलेला चंगळवाद, भोगवादी संस्कृती, नैसर्गिक साधनचा अतिरेकी वापर व त्‍यातून मानव प्राप्त करीत असलेला आनंद या समस्येवर आश्रमाची जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य दडलेले आहे असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी बोलतांना व्यक्त केले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिनानिमित्‍त्त आयाजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना सचिव संतोष गोरे म्हणाले की, आश्रम जीवनशैली ही ज्ञान प्रदान, श्रम प्रधान व कर्मप्रधान आहे. नैसर्गिक संसाधनाचा मर्यादीत वापर व धर्माचरण हे या जीवनशैलीचे प्राण घटक आहेत. आपल्या नंतरही या पृथ्वीवर इतर जीवांना जगता यावे. त्‍यांच्यासाठी शुध्द हवा, शुध्द पाणी, शुध्द अन्न मिळावे व निसर्गचक्र शाश्वत पध्दतीने चिरकाल टिकावे ही भावना विदयार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हवी असलेली वातावरण निर्मिती या जीवनपध्दतीत सापडते. वाढते तापमान व आर्दता तसेच प्लास्टिकचा अतिरेकी वापर व पॅकिंग फूड यामुळे मानवाचे आयुष्यमान कमी होत असून जगणेही असह्य होत आहे. विद्युत, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट यांचा वाढता वापर पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आणत आहे. जैव विविधता धोक्यात आली आहे. समृध्द पर्यावरण माणसाला शाश्वत जीवन देत असते. समाज आणि पर्यावरण ही विकासाची दोन चाके आहेत त्‍यांना चालना देण्यासाठी जैव रसायनांचा व जैव स्त्रोतांचा वापर होणे गरजेचे असल्याचेही त्‍यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे होते. त्‍यांनी पृथ्वी दिनाचे घोषवाक्य पृथ्वीवर गुंतवणूक करा असे आहे. आपण मात्र विकासाच्या नावाखाली अनेक प्रकारची गुंतवणूक केली. पण या सगळयात दुर्दैवाने पृथ्वीच्या आरोग्याकडे लक्ष दिल्या गेले नाही. वसुंधरेच्या बाबतीत सगळया देशांनी व जगातील सर्व नागरीकांनी गंभीर होणे गरजेचे आहे. तरच भविष्यात मानव सुखाने पृथ्वीवर जगू शकतो असे त्‍यांनी सांगितले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके यांनी केले.व्यासपीठावर महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मधूरा सातपूते,प्रा.जयपक्राश सोळंकी होते. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

बुधवार, २० एप्रिल, २०२२

चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी !

मेहकर तालुक्यात शाळापूर्व तयारी अभियान जोरात
दहा दिवसांनी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष संपणार आहे. महाराष्ट्र दिनी शाळांचे निकाल जाहिर करण्यात येतात. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्षाची नांदी सुरू झाली आहे त्‍यामुळे चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी लागल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील झेडपीच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राखविण्यात येत आहे. पाहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येत आहे हे विशेष. दोन वर्षांपासून शैक्षणिक नियोजन कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झाले होते. पुढील शैक्षणिक वर्षात नियोजन सुव्यवस्थीत व्हावे यासह शिक्षण विभाग सूचना देत आहे. यातचे शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांचा मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेहकर तालुक्यातील अनेक शाळांमधून पूर्वतयारी अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सहा वर्षपूर्ण झालेलया बालकास इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षातील मुलांची यादी शाळांकडून जमा केली जात आहे. सदर यादीतील वयानुसार पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांसाठी उपक्रम घेतले जात आहेत. पालक भेटीतून विद्यार्थ्यां प्रवेशबाबतची परिपूर्ण माहिती घेतली जात आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार सात विविध टप्प्यांवर निरिक्षण केले जात आहे. हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १४ रोजी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी फेरी काढून गावात इयत्‍ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची वजन, उंची, दोरीवरच्या उडया घेवून अभ्यासाविषयाची शैक्षणिक साहित्‍य देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, सरीता पवार, दत्‍तात्रय दशरथे, मिनाक्षी बंगाळे, संदीप पुरी, आशा साखरे यांनी अथक प्रयत्‍न केले. सध्या शाळापूर्व तयारी अभियान घेण्यात आले. प्रवेशसाठी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी पुढील शैक्षणिक वर्षात पहिली वर्गतील प्रवेशपात्र विद्यार्थी आणि पालक मेळाव्यात जनजागृती करण्यात आली. प्रकाश दुनगू, मुख्याध्यापक जि.प.के.म.प्रा.शाळा हिवरा आश्रम असे आहे शाळापूर्व तयारीची टप्पे विद्यार्थ्यांची नोंदणी, विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास, बौध्दिक विकास, विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनिक विकास,विदयार्थ्यांचा भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकाचा सहभाग असे शाळा पर्व तयारीचे टप्पे आहेत.

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

भगवान महावीरांची करूणा जगाच्या कल्याणासाठी - आर. बी. मालपाणी

विवेकानंद आश्रमात भगवान महावीरांचे पूजन 
 भगवान महावीरांचे जीवन त्‍याग, सेवा, संयम आणि करूणा प्रधान आहे. ते जितेंद्रीय होते. भोगासाठी तडफडणारे इंद्रिय नियंत्रणात ठेवून त्‍यांच्यार विजय मिळविल्यामुळेच ते महावीर ठरले. त्‍यांच्या जीवनात त्‍याग आणि संयम व मानव प्राण्याबद्दलची करूणा व त्‍यासाठी त्‍यांनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग ही काळाची गरज आहे. भगवान महावीरांची क्षमाशीलता व करूणा जगाच्या कल्याणासाठी  व जीवाच्या अस्तित्‍वासाठी महत्‍वाचे साधन बनले आहे असे उदगार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी संस्थेत संपन्न झालेल्या महावीर जयंती निमित्‍त बोलतांना व्यक्त केले. करूणा व क्षमा हे साधुच्या जीवनाचे मुख्य अंग आहे. आज जगात वर्णवर्चस्ववाद, साम्राज्यवाद व विनाशकारी युध्दाचे ढग जमा झालेले असतांना भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा मंत्र मानवाच्या भल्यासाठी तसेच त्‍यांचा जीवो और जीने दो हा संदेश मानव जातीसाठी आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले. चंगळवादी जीवनशैली व विस्तारवादी मानसीकता अन्यायवृत्‍तीला जन्म घालते. प्रेषीतांनी व संतांनी मानवाचा जन्म सत्‍कर्मासाठी, त्‍याग व संयमाच्या कसोटीचे पालन करण्यासाठी असल्याचा उपदेश केला आहे. भगवान महावीरांचे असंख्य अनुयायी त्‍यांच्या या तत्‍वांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. सुरूवातीला आश्रमात असलेल्या भगवान महावीरांच्या प्रतिमेचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रतिमेचे विधियुक्त पूजन करण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते व इतरांनी प्रतिमेचे पूजन केले. दिवसभर आलेल्या भाविकांना त्‍यानिमित्‍त अन्नदान करण्यात आले.