Responsive Ads Here

सोमवार, २९ एप्रिल, २०१९

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहभेटीने फुलणार विवेकानंद आश्रम


ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना  शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रम या छोट्या शाखेड्यात  १९८२ मध्ये विवेकानंद विद्या मंदिर सुरू केले. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असलेला तरुण निर्मितीसाठी विवेकानंद विद्या मंदिराने कटाक्षाने लक्ष दिले.  १९८२ ते २०१८ पर्यंत जे माजी विद्यार्थी याशैक्षणिक संकुलात शिकून गेलेत, त्यांचा गेट टू गेदर चा मित्रमेळा हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय विवेकानंद आश्रमाने घेतला आहे. विवेकानंद आश्रमात ९ जून २०१९ रोजी  विवेकानंद आश्रमात  सर्व माजी  विद्यार्थ्यांचा मेळा भरणार आहे.
विवेकानंद आश्रमाच्या वसतिगृहातील  विद्यार्थ्यांची दिनचर्या म्हणजे भावी आदर्श व्यक्तिमत्वाचा परिपाकच होय. विवेकानंद विद्या मंदिरातून शिक्षण घेणा-या  विद्यार्थ्यांना सदाचार,नीतीमूल्य,चारित्र्यसंपन्न,कर्तव्यदक्षता सोबत व्यावहारीक जीवनाचे धडेशिकविले जातात. कर्मयोगी प. पू. शुकदास महाराजश्री यांनी हिवरा आश्रम या खेड्या गावाच्या माळरानावर स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमाने राज्यसह जगभरात ओळख निर्माण केली आहे. १९८२ ते २०१८ या वर्षातील इयत्ता दहावी, इयत्ताबारावीची बॅच असलेल्या माजी  विद्यार्थ्यांचा हा गेट टू गेदर कार्यक्रम विवेकानंद आश्रमात दिनांक ९जून२०१९ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.  विवेकानंद आश्रमात आलेल्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत सेल्फी फोटो,ग्रुप फोटो काढण्यासाठी सेल्फी पार्इंट सुध्दा राहणार आहे.

३६ वर्षानंतर होणार मित्रांच्या भेटीगाठी
शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही कर्मयोगी संत शुकदास महाराजांची शिक्षणाची अत्यंत साध्या सरळ सोप्या शब्दात केलेली व्याख्या. मुलांना शिकवितांना ते कळेपर्यंत शिकवा हा महाराजश्रींचा आग्रह असे.विवेकानंद आश्रमाच्या विद्या मंदिरात शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना विवेकानंद आश्रमची झालेली प्रगती माहिती व्हावी,जुन्या मित्रांना पुन्हा भेटा यावे यासाठी गेट टू गेदरसाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला आहे,
 
माजी विद्यार्थी कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर
गेल्या ३६ वर्षांत विवेकानंद शैक्षणिक संकुलात शिकलेले विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर आणि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. राजकारण, समाजकारण, वैद्यकीय, सेवा, सहकार, पत्रकारिता, संरक्षण या सर्वच क्षेत्रांत या  विद्यार्थ्यांनी आपले नावकमावलेले असून आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक अग्रेसर आहेत.

बरेच विद्यार्थी प्रदीर्घ काळापासून विवेकानंद आश्रमातही आलेले नाहीत. त्यामुळे या सर्व  विद्यार्थ्यांना विवेकानंद आश्रमात पाचारण करून त्यांना विवेकानंद आश्रमाची झालेली प्रगती, भविष्यातील नियोजन आणि प. पू. शुकदास महाराजश्रींच्यासंकल्पाच्या पूर्ततेसाठी हवे असलेले त्यांचे सहकार्य याबाबत अवगत करून देण्यासाठी हे गेट टू गेदर ठेवण्यात आलेले आहे. विविध क्षेत्रात काम करर्णाया या माजी  विद्यार्थ्यांचा परिचयही एकमेकांना करून दिला जाणार आहे.                                                                       संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



शनिवार, २७ एप्रिल, २०१९

विवेकानंद आश्रमाच्या अन्नपुर्णेत सेंद्रीय भाजीपाल्याला प्राधान्य


रासायनिक खते किटक नाशकांचा अतिरेकी वापर सेंद्रीय शेती करण्याकडे  कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी प्राधान्य दिले. गोर गरीबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पोष्टीक,सकस अन्न मिळावे या हेतूने कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असा अन्नपुर्णा विभाग सुरू केला. या विभागात तीस ते चाळीस कर्मचारी करीत असून  विवेकानंद ज्ञानसंकुलातील विविध शाळा, महाविद्यालयांतील वसतीगृहात राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या अन्नपुर्णा विभागात सकस अन्नपदार्थ तयार केले जातात. विशेष बाब म्हणजे, भाजीपाला हा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला वापरला जातो. आश्रमाच्या अन्नपुर्णा विभागात दररोज दोन क्विंटल भाजीपाला वापरला जातो. त्यात पालक, फुल फळ कोबी, वांगे, मेथी, शेपू यांचा समावेश असतो. विशेष बाब  सेंद्रीय भाजीपाला विवेकानंद आश्रमाच्या शेतातच पिकविण्यात आलेला असतो. क्विचित प्रसंगी तो बाजारपेठेतून खरेदी केला जातो. महिन्याकाठी सरासरी ६० क्विंटल भाजीपाला लागत असतोविद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी सकस, सेंद्रीय पौष्टिक अन्नाच्या निर्मितीत अजिबात कसर केली जात नाही.
वाढत्या वयातील विद्यार्थ्यांना पुरेसे पोषणमूल्ये मिळतील, याची काळजी घेतली जाते. जेणेकरून  विद्यार्थी-विद्यार्थिनींची शारीरिक मानसिक वाढ योग्यरित्या होईल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे विवेकानंद आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
विवेकानंद आश्रमाद्वारे संचालित ज्ञानसंकुलात विवेकानंद विद्या मंदीर ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद कृषी कृषी व्यवस्थापन महाविद्यालये, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची शाळा, कॉन्व्हेंट  आदी शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. या सर्व शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी सरासरी तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी या वसतीगृहात निवासी असतात. या विद्यार्थी -विद्यार्थिनींना अतिशय माफक दरात भोजन सुरक्षित, सुविधापूर्ण निवासाची सोय विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात येते.

महिन्याकाठी लागतो ६० क्विंटल भाजीपाला
आश्रमाच्या अन्नपुर्णा विभागात दररोज दोन क्विंटल भाजीपाला वापरला जातोत्यात पालकफुल  फळ कोबीवांगेमेथीशेपू यांचा समावेश असतोविशेष बाब  सेंद्रीय भाजीपाला विवेकानंद आश्रमाच्या शेतातच पिकविण्यात आलेला असतोक्विचित प्रसंगी तो बाजारपेठेतून खरेदी केला जातोमहिन्याकाठी सरासरी ६० क्विंटल भाजीपाला लागत असतो

विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक प्रबोधन
विवेकानंद आश्रमाच्या अद्यावत अन्नपुर्णा विभागात एकाच वेळी  हजार विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. भोजना अगोदर अन्नसंस्कार केले जातात. भोजनापूर्वी विविध संस्कृत सुक्ते, गीतेतील अध्याय आणि आध्यात्मिक प्रबोधन केले जाते. या उच्च आध्यात्मिक वातावरणात हे अन्न सेवन करतात.

विवेकानंद आश्रमाची दिडशे एकर शेती असून, या शेतीत सेंद्रीय खतांचा वापर करून रासायनिक कीड आणि कीटकनाशके यांचा वापर टाळून केवळ नैसर्गिक पद्धतीने पिकविण्यात आलेला सकस भाजीपाला वापरण्यात येतो. त्यासाठी या शेतात ग्रीन हाऊस शेडनेटची सुविधा करण्यात आलेली आहे.
                                                                                संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

चारा भाव वाढीने बळीराजा हवालदिल


गेल्या दोन ते तीन वर्षापासून पावसाची सरासरी कमी झाल्याने दुष्काळाची दाहकतेची झळा बळीराजा व शेतीक्षेत्राला पोहचत आहे. दुष्काळी परिस्थीतीमुळे पशुपालकांसमोर चा-याची समस्या उभी राहली आहे. पशुपालकांना  गायी,म्हशीसाठी चारा वाढीव दराने विकत घेण्याची पाळी पडत असल्यामुळे बळीराजावर आर्थीक भार पडत आहे. मेहकर तालुक्यातील पशुपालकांना वाढीव दरात आपल्या जनावरांसाठी चारा खरेदी करावा लागत आहे.  अशातच उन्हाळयात दुध उत्पादनात घट झाल्याने त्याच्या दूध व्यवसायावर सुद्धा परिणाम होत आहे. बळीराजासमोर  पशु धन वाचविण्यासाठी  अनेक अडचणींना उभ्या राहिल्या आहेत. मेहकर तालुक्यातील शेतकरकयांना दुष्काकाळात देखील आर्थिक भार सहन करावा लागत आहे. चा-या अभावी दुध उत्पादनात कमालीची घट झाली आहे. मेहकर तालुक्यात  यंदा पुरेसा पाऊस नसल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. 
मेहकर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी व जनावरांच्या चा-याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यातच अल्प पावसामुळे खरिपातील पिके वाया गेली आहेत.  यंदा, मात्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालकांंकडून चा-याला मागणी जास्त असल्यामुळे जादा पैसे मोजूनही चारा मिळेनासा झाल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.  

असे आहेत चा-याचे भाव
सद्यस्थितीमध्ये बळीराजाला दादरचा चारा तीन हजार रूपये शेकडा दराने विकत घ्यावा लागत आहे तर ज्वारीचा कडबा ३००० रूपये शेकडा दराने विकत घ्यावा लागत आहे.त्यासोबत एक ट्रॉली कुटारासाठी साडे तीन हजार ते चार हजार ट्रॉलीसाठी रूपये मोजावे लागत आहे. 

दुष्काळी परिस्थितीमुळे चा-याचे भाव गगनाला पोहचल्यामुळे दुध व्यावसायिकांना अनेक आर्थीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्या हरभ-याचे कुटार भाव ४ रूपये किलोने विकत घ्यावे लागत आहे तर शाळू कडबा ३७०० रूपये शेकडयाने विकत घ्यावा लागत असल्यामुळे दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागत आहे. 
                         सतिष संजाबराव धोंडगेदुध व्यवसायिक कंबरखेड

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८