Responsive Ads Here

रविवार, २८ एप्रिल, २०२४

विवेकानंद आश्रम ज्ञानगंगेचा भगीरथ - शिक्षण उपसंचालक डॉ.पानझाडे

भगीरथाने प्रयत्‍नांची पराकाष्टा करून लक्षावधीजीवांना तसेच पशू पक्षी व निसर्ग यांना जीवन देणाऱ्या गंगेला अवतीर्ण केले अशी अख्यायिकाआहे त्‍याचप्रमाणे प.पू.शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील, तळागाळातील उपेक्षित आणिवंचितांचे जीवन समृध्द व शहाणे करण्यासाठी उजाड आणि निर्मनुष्य माळरानावर ज्ञानगंगाअवतीर्ण केली व लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी जीवन बहाल केले असे उदगार महाराष्ट्रराज्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे पुणे यांनी विवेकानंद आश्रमास भेटी प्रसंगीकाढले. शिक्षण व ज्ञान ही सर्वोच शक्ती आहे. त्‍यामुळेच मानवी जीवनाला अर्थ प्राप्तहोतो. शिक्षणासोबत स्वावलंबन, सदाचार या मुल्यांना प्राधान्य देत आल्यामुळे या संस्थेच्याशाळा व महाविद्यालयाची प्रगती झाली. शिक्षणाला व्यवसायाचे रूप न येवू देता. ती सेवाआहे व या सेवेचे व्रत आपण स्विकारले आहे अशी भूमिका प्रत्‍येक शाळेने घेतल्यास विद्यार्थ्यांनाअपेक्षीत मुलभूत भौतिक सोयी सुविधांची कमतरता पडणार नाही असे विचारही त्‍यांनी यावेळीव्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी त्‍यांचेपुष्पगुच्छ व ग्रंथ देवून स्वागत केले. संस्थेच्या सर्व सेवाउपक्रमांना यावेळी त्‍यांनीभेट दिली. विवेकानंद स्मारक हे पर्यटकांसाठी मिनी कन्याकुमारी आहे. याठिकाणी आल्यानंतरविवेकानंदांच्या दिव्य विचारांची,त्‍यांच्या तत्‍वज्ञानाची प्रेरणा प्रत्‍येकाच्याअंर्तमनाला स्पर्श करून जाते. आश्रमाने केलेले निसर्गाचे संवर्धन त्‍यामुळे नजरेस पडणारीहिरवी झाडी परिसराची स्वच्छता आणि निळाशार जलाशय अत्‍यंत नयनरम्य आहे. शिक्षणातील मुलींचाटक्का वाढविणे गरजेचे आहे. शाळा बाह्य मुले शोधणे व त्‍यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे तसेचमराठी शाळा टिकून राहणे हे शिक्षण विभागा समोरील मोठे आव्हान आहे परंतु शिक्षण क्षेत्रातीलसर्व संस्था, शिक्षक, पालक व समाजातील सर्व घटक हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज व सक्षमआहे असे विचारही त्‍यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.  याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, विश्वस्त कैलास भिसडे, प्राचार्य आर. डी. पवार, प्रा. गणेश चिंचोले इत्‍यादी मान्यवर उपस्थितहोते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा