Responsive Ads Here

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

आधी लगीन लोकशाहीचं ! मंडपात जाण्यापूर्वी नवरी - नवरदेव मतदान केंद्रावर


देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. आज देशातील 12 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. दरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरा-नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावे आणि मतदान करावे असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्‍येकाने मतदान केले पाहिजेत. मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचे हात बळकत होतात. मतदाना बाबत अजून सुध्दा पाहिजे तेवढया प्रमाणात जागृती झाली नाही.लोकशाहीने प्रत्‍येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी ता. २६ रोजी पार पडले. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्त्री,पुरूष,जेष्ठांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.बोहल्यावर चढयाआधीच नवरदेव नवरीने सुध्दा आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र दिसून आले. मेहकर तालुक्यातील ब्रह्मपूरी येथील माजी पंचायत समिती सदस्य गजाननदादा पाटील यांचे चिरंजीव अक्षय गजानन म्हस्के या नवरदेवाने सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव अक्षय म्हस्के यांची होणारी अर्धांगिनी वर्दडा येथील डिगांबर आसाबे यांची कन्या चि.सौ.कां.तेजल डिगांबर आसाबे हीने सुध्दा सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला  हिवरा आश्रम परिसरात सुध्दा सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरीकांचा मोठा उत्‍साह दिसून आला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा