संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
विवेकानंद कृषि महाविद्यालय देशभक्तीच्या घोषवाक्यांनी दुमदुमले !
ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य प्राप्त होवून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव आहे. यानिनित्ताने शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविल्या जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत येथील निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी शनिवारी ता.१३ रोजी हर घर तिरंगा जनजागृती अभियान रॅली आयोजन करण्यात आले होते . विवेकानंद कृषि महाविद्यालय परिसरात सकाळी ७.३० वाजता विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढली. या रॅलीत विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी,विद्यार्थीनींनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत गावामध्ये हर घर तिरंगा अभियानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. यावेळी घर हर मे तिरंगा हर मन तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान, चला घरोघरी तिरंगा फडकू स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठया अभिमानाने,हर्ष आणि उल्हासाने सर्व मिळुन साजरा करू या, तिरंगा आपला भारतीय ध्वज उंच उंच फडकवू चला देशासाठी लढुन याची आणखी शान वाढवूच्या घोषणांनी हिवरा आश्रम परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीच्या घोषवाक्यांनी परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. रॅलीमध्ये शैक्षणिक विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवसाय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मंगेश जकाते.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशिल दळवी,कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतिक उगले यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा