Responsive Ads Here

शुक्रवार, ३१ मे, २०१९

विवेकानंद आश्रमात बालसंस्कार शिबीराचे आयोजन


शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विवेकानंद आश्रमात उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा दि. जून पासून ते २१ जून पर्यंत या बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील विविध सुप्तगुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने अशी शिबीरे महत्वाची ठरतात. शालेय कालखंडात अभ्यास, शिकवणी, गृहपाठ या उपक्रमांना विद्यार्थी कंटाळलेले असतात. त्या साचेबंध्द जीवनशैलीत मनाप्रमाणे खेळणे, बागडणे स्वतःमधील विविध कलागुणांना वाव मिळण्याची शक्यता कमी असते. शालेतून घरी आलेली मुले मोबाईल किंवा  संगणकात डोके घालून बसलेली दिसतात. त्यांच्या हातातील मोबाईल काढून टाकण्यासाठी त्यांना मैदानावर शारीरीक कसरतीचे धडे देण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. या शिबीरात मुला मुलींची निवासी व्यवस्था करण्यात आली असून दि. जूनला सकाळी ११ वाजता या शिबीराचे उदघाटन संत साहित्याचे अभ्यासक प्रख्यात्य वक्ते विठ्ठल रूखमिनी देवस्थान पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी राहणार आहेत. या शिबीराचा जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी लाभ घेण्याचे आवाहन  आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

चुमुकल्यांच्या सुप्त कलागुणांना  संधी 
सकाळी  ते .३० रनिंगयोग प्राणायमप्रार्थना प्रख्यात योगशिक्षक नाना इंगळेघनश्याम गोरे हे घेणार आहे.३० ते .३० प्रातविधी  तयार होणे.३० ते .३० सुसंस्कार वर्ग.३० ते .३० क्रीडा प्रशिक्षक विजय गोरे यांचे मॅटवरील कुस्ती  मल्लखांबाचे बेसिक.३० ते १० जेवन१० ते ११ इंग्रजी संभाषण वर्ग११ ते  रेणू महामुने,भूषण महामुने यांचे नृत्य गायन  अभिनय कौशल्य  ते .३० अल्पोहार.३० ते  विश्रांती ते .३० मान्यवरांचे कथाकथन,  विद्यार्थ्यांना व्यासपीठावर प्रदर्शन करण्याची खुली संधी .३० ते  लाठीकाठीलेझीमतलवारबाजीचे प्रशिक्षणसायंकाळी  ते   जेवन ते  हरीपाठगीतापाठहनुमान चालीसा पठनअनुभूती अभंग   पठन  सामूदायीक प्रार्थना हभप  येवले शास्त्री  थुट्टे  शास्त्री यांचे  चिंतन


संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

बुधवार, २९ मे, २०१९

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळा तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर विज्ञान शाखेमध्ये कु.वैष्णवी संजय रहाटे,दत्तात्रय कारभारी वाघ,कु.संचिता संजय जटाळे तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला असून यामध्ये कृष्णा चंदन पिसाळ,कु.मीना मधुकर जवंजाळ,कु.माया साहेबराव जाधव यांनी यश संपादन केले आहे. वरील दोन्ही शाखांमधून ८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ६२ विद्यार्थी  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान व कला शाखांचा निकाल अनुक्रमे विज्ञान शाखा १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला आहे. तर विवेकानंद व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९३.५४ टक्के लागला आहे. इयत्ता बारावीच्या सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे ,आत्मानंद थोरहाते,विष्णुपंत कुलवंत,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास भिसडे,उपप्राचार्य अशोक गि-हे,पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम जामकर तसेच ज्युनिअर कॉलजच्या सर्व प्राध्यापकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक   करून अभिनंदन केले आहे.


रविवार, १२ मे, २०१९

सावित्रीच्या लेकीची डेअरी व्यवसायात झेप


जिद्द,चिकाटी,मेहनत कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील महिला सुध्दा आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे यशस्वीपणे पादाक्रांत करू शकतात याचाच प्रत्यय हिवरा आश्रम येथील सुशिक्षीत महिला सौ.मनिषा एकनाथ आव्हाळे यांनी सुरू केलेल्या आदित्य दुध डेअरी अ‍ॅन्ड डेली निडस या व्यवसायाच्या रूपाने दिसून येतो. ग्रामीण महिला सुध्दा कुठलाही व्यवसाय तितक्याच यशस्वीपणे सुरू करू शकतात ही प्रेरणा इतर  महिलांना दिली आहेमनिषा आव्हाळे यांनी दुध डेअरी या पुरूषांच्या मक्तेदारी असलेल्या व्यवसायात त्यांनी भरभक्कमपणे पाय रोवले आहे. दुध संकलन वितरणातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडत हिवरा आश्रम सारख्या खेडयात दुध संकलन वितरणाचा व्यवसाय यशस्वीपणे पार पाडला. त्यांनी सुरू केले या व्यवसायातून इतर महिलांसाठी त्या ऑयकॉन ठरत आहेत. ग्रामीण भागात महिला व्यवसायीका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मनिषा एकनाथ आव्हाळे या उच्चशिक्षीत असून त्यांनी दुध डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा मानस पती एकनाथ आव्हाळे यांच्या कडे व्यक्त करून पतीच्या होकारा नंतर हा व्यवसाय समर्थपणे सुरू केला आहे. दुध संकलनाचा व्यवसाय परवडत नाही म्हणून अनेकांनी दुध संकलन व्यवसायाकडे पाठ फिरवीली असतांना योग्य गुणवत्ता योग्य नियोजनातून मनिषा एकनाथ आव्हाळे यांनी ग्रामीण भागात दुध संकलनाचा व्यवसायात यशस्वी होवू शकतो हे सिध्द केले आहे. मनिषा आव्हाळे यांनी व्यवसायातील चिकाटीने दुध संकलन व्यवसाय यशस्वी केला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपला ठसा उमटवला आहे. दुध व्यवसायिकांच्या दुधाला फॅटनुसार चांगला भाव मिळतो. या डेअरीमध्ये दररोज १५० ते २०० लिटर गायी,म्हशीच्या दुधाचे संकलन केल्यानंतर ग्राहकांना दुधाचे वितरण होते.

मुल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती
प्रत्येक हंगामानुसार पदार्थाची मागणी कमी-जास्त होत असते. पनीरला दररोज म्हणजे पाच किलोपर्यंत मागणी राहते. हंगामात दिवसाला २० लिटर दही, ताक विक्री होते. दुध संकलन व्यवसायात अतिरीक्त दुधापासून दही,तुप,पनीर,ताक,श्रीखंड अशी उत्पादनाची निर्मिती करून मनिषा आव्हाळे यांनी  दुध संकलन व्यवसायाचे अर्थकारण सुधारले आहे. 

२०० ते ३०० लिटर दुधाचे संकलन वितरण
हिवरा आश्रम ही जवल्पासच्या ३० ते ४० गावाची मोठी बाजारपेठ आहे. हिवरा आश्रम येथे मोठा नोकरदार वर्ग असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. आदित्य दुध डेअरी अ‍ॅन्ड डेली निडस मध्ये दररोज जवळपास २०० ते ३०० लिटर दुधाचे संकलन वितरण होते.

ग्रामीण भागातील महिलांनी  आत्मविश्वासाने व्यवसाय सुरु केला तर यश मिळतेच. या भावनेतून दूध डेअरी सुरु केला.
                                                        मनीषा एकनाथ आव्हाळे.हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८