Responsive Ads Here

रविवार, ४ मार्च, २०१८

सत्संग भाग ४


संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥
संतांची हे कळा पाहतां न कळे । खेळोनियां खेळ वेगळाची ॥२॥
संतांचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणे ॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली । कल्पना निमाली संतापायीं ॥४॥

प्रस्तुत अभंगातुन नामदेव महाराज संताचे जीवन कार्य व त्यांची महती वर्णन करतात.संतसंगतीमुळेच सामान्यातील सामान्य व्यक्तीला स्व स्वरूपाचा अनुभव सहज घेता येतो. संताच्या संगतीचा महिमा किता आणि कसा वर्णवा ?  हा मोठा गहन प्रश्न साक्षात ब्रम्हदेवाला सुध्दा पडावा एवढा संताचा महीमा अगाध व गहन आहे. मनुष्याला संताचे महीमा उमजला तरी तो शब्दातीत असल्यामुळे वर्णन करता येवून शकत नाही.मायेच्या पलीकडे असणारे गुहय ज्ञान प्राप्तीचा मार्ग केवळ संताच्या  संगतीनेच कळू शकतो. संत मोक्षरूपी संपत्तीने सामान्यातील सामान्य मनुष्याला सुध्दा श्रीमंत बनवितात. संताच्या जीवन हे समाज उध्दारसाठी ,उत्कर्षासाठीच असते. नामदेव महाराज म्हणतात की, असे संताची भेट झाल्यस जीवन धन्य कृतार्थ होते. मनातील कल्पना ,व्देष,लोभ आपोआप नष्ट होऊन जातात.संताचे अतःकरण म्ळणजे आत्मस्वरूप जागृत करण्याचे उत्तमातील उत्तम साधनच होय. संगतीने आत्मसुखाची प्राप्ती होवू शकते.



लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा