Responsive Ads Here

शनिवार, ३० जून, २०१८

कृषीपृत्रांचे बळीराजासाठी इन्फार्मेशन कॉर्नर !


शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती संबधी माहिती,शेतीकरी यशोगाथाशेती पुरक व्यवसाय माहिती,किड व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,बागायती शेती,पशू पालन,फळबाग लागवड या संबंधी शेतक-यांना माहिती होण्या च्या  दृष्टीनेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात लव्हाळा येथे परिसरातील बळीराजासाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे.

यावेळी सरपंच दिनकर कंकाळ,उपसरपंच अमोल गारोळे,संदीप सवडतकर,दिपक लहाने,जगनराव कंकाळ,दत्ता काळे,चंद्रभान लहाने,दत्तात्रय कंकाळ,श्रीकृष्ण लहाने,संतोष कंकाळ,अशोक गारोळे,भगवान लहाने यांचे सह परिसरातील शेकडो शेतकरी बांधवउपस्थित होते.
 भारत हा देश  कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातोदेशातीत नागरीक शेती  शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबुन आहेशेतक-यांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची उत्पादकता  उत्पन्न वाढवावेशेतीच्यासमृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे.
पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.  देशातील  साक्षर पिढी शेती व्यवसायात उतरत आहे.  त्यामुळे  शेतीमध्ये विविधप्रयोग करून शेतीचे उत्पन्नात वाढ होत आहेशेतीमध्ये झालेले संशोधन  शेतक-यांनी अवलंब केलेले संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान या गोष्टींमुळे शेतीचा विकास होईलयांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन  कामाची गुणवत्तासुधारतेयामुळे पारंपारिक शेतीमध्ये बदल करून तुषार,ठिबक सिंचनाच्या साहयाने बागायती शेती करावी अशी माहिती यावेळी शेतकरी बांधवांना देण्यात आली.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी पुत्र ग्रुप मध्ये सागर सोमटकरप्रसाद घरपाहुणेवैभव जाधवअजय चिंचोलेऋषीकेश शेळकेआकश ढोणेअमारासाई तेजाराजशेखर मिटूसाईसतिष या विद्यार्थ्यांचा समावेश आहेविवेकानंद कृषीपुत्र ग्रुपच्याविद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शेतकरी  बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण आहेशेतकरी बांधवांना  या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था विवेकानंद कृषीपुत्र  ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
                                                                    डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

इन्फॉर्मेशन कॉर्नर च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल .  या फलकावरील   माहिती नियमित अद्यावत करण्यात येणार आहे.
                                                        सागर सोमटकरविवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते 
पत्रकार दैनिक सकाळ 
मो.९९२३२०९६५८
'श्रीनिवास' विवेकानंद नगर हिवरा आश्रम 
ता,मेहकर जि.बुलडाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा