Responsive Ads Here

शुक्रवार, ८ जून, २०१८

यशाचा मार्ग दाखविणारे विवेकानंद विद्या मंदिर !





स्वामी विवेकानंदांच्या दिव्य व ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी हिवरा आश्रम या छोट्या खेड्यामध्ये विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. ग्रामीण भागातील कष्टकरी,भोळ्याबाबड्या लोकांना स्वामी विवेकानंदांचे वैचारीक विचार  उमगण्यासाठी,कळण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य कर्मयोगी संत शुकदास महाराजश्रींनी केले. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज आयुष्यभर समाजाच्या उत्कर्षासाठी,समाजोन्नतीसाठी अविरतपणे कार्य कार्य केले.
ज्या मी देवाचा, आहे उपासकA करून ओळख, देतो त्याची AA
 या इकडे तुम्ही, पहा तो नयनीA  नटला रूपांनी, दुःखितांच्याAA
महाराजश्रीं रंजल्या गांजल्या मध्ये ईश्वर शोधून त्यांची शिव भावे सेवा केली. दीड कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. शिक्षणा शिवाय समाजाचा विकास अशक्य आहे हे ओळखून महाराजश्रींनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात प्रवाहित केली. शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची अत्यंत साधी,सरळ व सर्वसामान्याला कळेल अशी व्याख्या  कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री केली. ज्या शिक्षणामुळे मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते ते खरे शिक्षण... शिक्षण म्हणजे मानवी मूल्याची जोपासना करीत आदर्श जीवन जगण्याला मदत करणारी प्रणाली... प्रत्येक गोष्ट विवेकाच्या कसोटी तपासून पाहण्याची क्षमता विकसीत करण्याची कला म्हणजे शिक्षण... जे शिक्षण घेतल्याने माणसातील माणूसपण जागृत होते ते खरे शिक्षण...ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुरूकुल पध्दतीने हसत खेळत क्लिष्ट वाटणारे विषय अत्यंत साध्या व सोप्या पध्दतीने शिकविण्याची कला ज्या विद्या मंदिरात शिकविली जाते ते म्हणजे विवेकानंद विद्या मंदिर... आयुष्याला कडक शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही.विवेकानंद विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्काराचे मूल्य त्याच्या बालमनावर रुजविल्या जाते.या विद्या मंदिराची गेल्या अनेक वर्षांपासून यशाची उज्वल परंपरा कायम असून यावर्षी सुध्दा  ज्या शिक्षणामुळे समाजाच्याग्रामीण भागातील होतकरू,हुशार गरीब विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी विवेकानंद विद्या मंदिराची सुरूवात केली. विवेकानंद विद्या मंदिर म्हणजे कडक शिस्त,गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीचा ध्यास घेतलेली शैक्षणिक संस्था होय. विवेकानंद विद्या मंदिरातील सर्मपित भावनेने ज्ञान यज्ञाचे कार्य करणारे शिक्षकवृंद विद्याथ्र्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सदोदीत प्रयत्नशील असतात. यावर्षी सुध्दा दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा विवेकानंद विद्या मंदिराने कायम राखली आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिराचा इयत्ता दहावीचा  निकाला ८६.१४ टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. परिक्षेला २५९ विद्यार्थी बसले असून २२४ विद्याथ्र्यांनी परिक्षेत यश प्राप्त केले आहे. प्राविण्य श्रेणीत ५३,प्रथम श्रेणीत ६७ ,व्दितीय श्रेणीत ७७ तर पास श्रेणीत २७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दिपक भुजंगराव दिवठाणे याने गणित व संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून ९६.२० टक्के गुण संपादन केले आहे. सागर विजय अवचार ९६ टक्के,कु श्रध्दा रविंद्र नप्ते ९५ टक्के, उदय महादेव धोंडगे ९४.६०,कु.पुनम प्रभाकर अवचार ९४ टक्के,कु.वैष्णवी भाष्कर आटोळे ९३.८० टक्के, सुमित संतोष लोळगे ९३.८० टक्के,देवदत्त विकास खरात ९३.६० टक्के, साहिल श्रीराम काळे ९२.४० टक्के,अभिषेक विष्णु रहाटे ९२.४०,कु.अन्नपुर्णा अर्जुन थोरहाते ९१ टक्के,कु.समृध्दी सुनिल मवाळ ९०.४० टक्के,वैभव सुरेश बोरे ९०.४०, कु.राई प्रदीपकुमार लांडे ९०.२० टक्के,कु.प्रिती गणेश इंगळे ९०.२० टक्के तर गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळणा-या सागर विजय अवचार,उदय महादेव धोंडगे, कु.श्रध्दा नप्ते,अभिषेक विष्णु रहाटे या विद्याथ्र्यांनी गुण संपादन केले. हे सर्व गुणवंत विद्यार्थी कुठल्याही शहारातील महागडया शिकवणी वर्गाशिवाय त्यांनी हे यश संपादन केले आहे हे विशेष.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८७


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा