माणसाच जगण अमूल्य आहे. जगण्यातल्या वास्तवापासून दूर गेल्याने आभासी जगाचे आकर्षण वाटू लागते. जगण्यात येणा-या समस्या सोडवतांना तोल न ढळू देता वास्तवाचे भान ठेवावे. कुठलाही चमत्कार आपल्या जगण्यातील गती कमी अधिक करू शकत नाही. शाश्वत मूल्यांचा अंगिकार केल्याने जगण्याला बळ मिळते. आभासी दुनियेतून बाहेर या, आयुष्याकडे डोळे उघडून बघायला शिका!असा मौलिक संदेश प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दैनिक सकाळशी मंगळवारी (ता.५) मुलाखती दरम्यान दिला. दरम्यान अंतरिक प्रेरणा चिरंतन प्रवाहीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विवेकानंद आश्रम समाजाचे शक्तीस्थळ
विवेकानंद आश्रमासारख्या याच अर्थाने समाजाचे शक्तीस्थळ आहे. या परिसरात आल्याने मानवी संवेदनांना पाझर फुटतो. आपल्यात असलेल्या अलौकीक सामर्थ्याची जाणिव निर्माण होते व लक्षात येते की, त्याच्यात आणि माझ्यात काहीच अंतर शिल्लक नाही.
तरुणांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत
तरूणांना मी हेच सांगेन मशाली पेटत्या ठेवा. अंधाराचे साम्राज्य केंव्हाही विस्तारू शकते. कणखरपणे उभे राहा. जीवनात संघर्ष करायला शिका. तुमच्यात सॉक्रेटीस,जिझस,बुध्द,विवेकानंद ,टागोर आहेत. विसरू नका तरुणांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा