Responsive Ads Here

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

शिक्षणाने निर्भय जगण्याची ताकद मिळते- संतोष गोरे


शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. शिक्षणा पासून समाजातील एकही व्यक्ती वंचित राहता कामा नये. श्रीमंतीने माणूस मोठा होत नाही तर शिक्षणाने मोठो होतो. शिक्षणाने निर्भय जगण्याची ताकद मिळते असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले.

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजीत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बुधवारी दि.५ रोजी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरूवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यू.सावरकर तर प्रमुख पाहूणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णुपंत कुलवंत तथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते पुढे बोलतांना म्हणाले की, सुसंस्कृत शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. शिक्षक शिकविता शिकविता विद्यार्थ्यांना आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य,शक्ती देतो. शिक्षक हा सभ्य,सुसंस्कृत समाजाची निर्मिती करण्यासाठी सदैव झटत असतो. शिक्षक ज्ञानाचा स्त्रोतक असतो. शिक्षक आदर्श तत्वज्ञ आणि मार्गदर्शन असतो असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. प्रा.जयप्रकाश सोळंकी, प्रा.मनोज मु-हेकर, प्रा.गजानन ठाकरे,प्रा.किशोर गवई,प्रा.योगेश काळे, प्रा.कु.पल्लवी रायमूलकर, प्रा.कु.मनिषा कुडके, प्रा.कु.पल्लवी मिटकरी, प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.प्रियांका वायसे यांचा यावेळी शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड, सूत्रसंचालन कु. शिवानी सोळंकी,कु.शिवानी रडाळ तर आभार प्रदर्शन कु. गीता म्हस्के यांनी मानले. 

संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा