अष्टावधानी निवेदक : शिक्षक अरविंद शिंगाडे

आपल्या निसर्गदत्त निवेदन शैलीच्या जोरावर, कल्पक शब्दफुलांच्या मोगऱ्याच्या दरवळाने अनेक राज्यस्तरीय समारंभमध्ये श्रवण सौख्यच्या हिरवळी फुलवत, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून मान्यवरणसह रसिकाना वैचारिक मेजवानीची दिव्य भेट प्रदान करून,, काळजात भरजारी वस्त्र विणणारे महाराष्ट्रातील खायत्नाम अष्टावधानी निवेदक, एक संवेदनशील बहुआयामी साहित्यिक, अभ्यासू व व्यासंगी वक्ते तथा महापुरुष्याच्या जीवनाचे भाष्यकार,वऱ्हाडी भाषेतील लोकमान्य कथा कथनकार,स्तंभलेखक, हजारो विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन करणारे बुलढाणा डायटचे कौनशिलर, मुक्त पत्रकार, उत्तुंग प्रतिभासम्पन्न कवी, प्रभावी समुपदेशक, सामाजिक तीव्र भान व तळागाळातील समाजातील शोषितांच्या जगण्याचा वैशाख आपल्या लेखणीतून प्रकट करणारे द्रष्टे समाजाभिमुख लेखक, उदंड लोकप्रियता लाभलेले अग्रगण्य सूत्रसंचालक, ब्रिटिश कौन्सिल या जागतिक संस्थेचे राज्य स्तरीय तजमार्गदर्शक, आपल्या अंगी असलेल्या उपजत नेतृत्व, कर्तृत्व, व वक्तृत्व गुणाने विविधांगी क्षेत्रातील अनेक कार्यक्रमातील उत्तम व यशस्वी संयोजक म्हणून साहित्य, शिक्षण, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वाना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक मानवनिष्ठ चळवळीचे पुरस्कर्ते, विदयार्थी प्रेमात आकंठ बुडालेले उपक्रमशील उत्तुंग व दैदीप्यमान कल्पकतेचे धनी, बुलढाणा जिल्ह्यासाह अनेक सामाजिक व पर्यावरण प्रकलपांचे आधारवड, अशी कित्येक सार्थ विशेषणे ज्यांची आभूषणे आहेत, असे महाराष्टातील ख्यातानाम अष्टपैलू साहित्यिक, आदरणीय अरविंदजी शिंगाडे सर यांचा आज वाढदिवस. आदरणीय सरांना सर्व प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. "वेडे हवे जगाला तारून न्यावयाला घे एक वेडं कुठले माणूस व्हावायला "' या ओळीचे सारथी बनत, जिद्द चिकाटी, अभ्यासू वृत्ती, व्यासंगी वृत्ती, व जिज्ञासा या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यवर्तुळत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुठल्याही कार्यक्रमातील त्यांचे बहारदार संचलन अनेकांना भावून जाते. कोणताही कार्यक्रम म्हटला की सूत्रसंचलन महत्वाचे असते. अरविंद शिंगाडे यांचे विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमातील संचलनासोबत विविध काव्य मैफीलींचे निवेदन रसिकांची दाद मिळविणारे असते . संचलन कसे करावे ? त्यातील बारकावे समजतील अशा अत्यंत सोप्या शब्दात अरविंद शिंगाडे सर यांनी 'सुत्रसंचालनाची सुत्रे ' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांच्या या पुस्तकाला भरघोस असा प्रतिसाद सुध्दा मिळाला. विशेष म्हणजे हे पुस्तकरूपी अनमोल धन अनेक चाहत्यांच्या घरापर्यंत मोफत घर पोहोच करत, आगळी वेगळी कृतिशील साहित्य निष्ठा त्यांनी अधोरेखित केली आहे.सोबतच त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे 'क करिअरचा ' हे ई - बुक सुद्धा प्रकाशित झाले आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी करिअर कौन्सिलिंग, मानसशास्त्रीय समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन तसेच वक्तृत्व व निवेदनाच्या कार्यशाळा घेण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो." "बुडते हे जन, न देखवे डोळा! म्हणोनी कळवळा येत असे!" ह्या संत वचनाचे सारथ्य पत्करून ते मार्गस्थ होतं, अनेक विदयार्थ्यांना उत्तम करिअर ची संजीवनी बहाल करत आहेत. मोबाईल द्वारा त्यांनी घेतलेल्या अनेक करिअर ऑनलाईन कार्यशाळा प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांनी आकाशवाणी जळगाववरुन भाषण सुध्दा दिले आहे. त्यांनी एका शैक्षणिक लघुचित्रपटात शिक्षकाची भूमिकाही केलेली आहे . त्यांचे वऱ्हाडी बोलीतील ' ऑफ पिरियड ' हे शैक्षणिक स्तंभलेखन सर्वदूर परिचित आहे. कथाकथन, कथालेखनही ते करतात .मराठी भाषेतील विविध बोलींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्यातील उपक्रमशील शिक्षक यांनी स्थापन केलेल्या मायबोली प्रतिष्ठानअंतर्गत अनेक कवितांचा 'वऱ्हाडी ' बोलीतून अनुवाद ते करीत असतात. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन नेहमीच करत असतात. कानातून मनात आणि मनातून हृदयात उतरविण्याचं प्राबल्य यांच्या दमदार प्रबोधनात जाणवते. याच कारण त्यांचं प्रबोधन फक्त स्टेज पुरतं मर्यादित नाही, करणी आणि कथनी यामध्ये एकवाक्यता आणण्याची त्यांची प्रामाणिक धडपड अनेकांना भावते. "पुढे स्नेह पाझरे,, मागे चलती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा माझी """ ही दिव्य अनुभूती त्त्यांच्या लेखणी आणि वाणीमधून प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अभिजात मराठी शिक्षक साहित्य संघ अशा साहित्यिक व विवेकी चळवळीमध्ये अरविंद शिंगाडे यांचा नेहमीच प्रामुख्याने सहभाग राहला आहे. त्यांना दोन्हीही मुली आहेत. मोठी मुलगी MBBS मध्ये शिकत असून दोघींनाही उच्चशिक्षित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसावे, तसे कर्तृत्व त्यांच्या अवन्ति मुलीने सिद्ध केले आहे.स्कॉलर शिपच्या परीक्षेत अव्व्ल स्थान पटकवात आपल्या गुणवत्तेची चुनुख सिद्ध केली आहे, तिच्या दर्जेदार कविता आणि उत्कृष्ट संवाद कौशल्याची प्रचिती, सरांचा वकृत्वाचा वारसा तिच्यात संक्रमित झाल्याची दिव्य प्रचिती येते. समाजाच्या सर्वच स्तरात समरस होण्याची निसर्ग दत्त संवेदना लाभल्याने खूप मोठा चाहता वर्ग महाराष्ट्र भर विस्तारित आहेत. मैत्रीच्या बाबतीत सर तर कुबेर आहेत. अफाट लोकसंसंग्रह आणि प्रचंड व्यस्त अशी जीवन शैली असतांना देखील,, मित्रासाठी काहीपण,,,, हा त्याचा मूळ स्वभाव. "आपण आहोत "हे त्यांचे शब्द अनेक मित्रांना भक्कम बळ देतात. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रमच्या वतीने राज्यस्तरीय सेवासमर्पण पुरस्कार २०१५ सुध्दा त्यांना मिळाला आहे. अशा या अल्पावधीत सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिक्षक अरविंद शिंगाडे सर यांचा प्रेरणादायी प्रवास खरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या विविधांगी पैलूवर प्रकाश टाकताना शब्दांच दारिद्र्य वेळोवेळी जाणवते. आपल्या अमोघ वाणीच्या जोरावर त्यांनी गझल नवाब भीमराव दादा पंचांळे यांच्या स्वर मैफिलीचे उत्कृष्ट निवेदन करत. "जैसे साच आणि मवाळ! मितले आणि रसाळ! शब्द जैसे कल्लोळ! अमृताचे " ही दिव्य अशी अमृतानुभूती घडवून दिली. विद्वता प्रखर, जळजळीत, तेजस्वी असते असं आपण नेहमीच म्हणतो, परंतु विद्वता शारदेच्या चांदण्यासारखी शीतल असते, याचा अनुभव सरांच्या सहवासात तुम्हास नक्कीच मिळेल. त्यांचं अभिष्टचिंतन करतांना त्यांचं व्यक्तिमत्व शब्दबद्ध करतांना एवढंच म्हणावं लागेल, "पायाखाली घ्यावी दुनिया नितीने कमवावी भाकरं. जीवच व्हावा असा गोड की अश्रूतूनही यावी साखर.. श्री.अनंत शेळके शिक्षक हिवरा आश्रम मो.9373836853

आश्रम जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य - संतोष गोरे

पर्यावरण सुरक्षा ही जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मानवाला जीवन देणारी व संगोपन करणारी वसुंधरा क्षतीग्रस्त होत आहे. तीला निरोगी ठेवणे आवश्यक झाले आहे. वाढती औद्योगीक प्रगती व विकासाच्या नावाने वाढलेला चंगळवाद, भोगवादी संस्कृती, नैसर्गिक साधनचा अतिरेकी वापर व त्‍यातून मानव प्राप्त करीत असलेला आनंद या समस्येवर आश्रमाची जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य दडलेले आहे असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी बोलतांना व्यक्त केले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिनानिमित्‍त्त आयाजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना सचिव संतोष गोरे म्हणाले की, आश्रम जीवनशैली ही ज्ञान प्रदान, श्रम प्रधान व कर्मप्रधान आहे. नैसर्गिक संसाधनाचा मर्यादीत वापर व धर्माचरण हे या जीवनशैलीचे प्राण घटक आहेत. आपल्या नंतरही या पृथ्वीवर इतर जीवांना जगता यावे. त्‍यांच्यासाठी शुध्द हवा, शुध्द पाणी, शुध्द अन्न मिळावे व निसर्गचक्र शाश्वत पध्दतीने चिरकाल टिकावे ही भावना विदयार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हवी असलेली वातावरण निर्मिती या जीवनपध्दतीत सापडते. वाढते तापमान व आर्दता तसेच प्लास्टिकचा अतिरेकी वापर व पॅकिंग फूड यामुळे मानवाचे आयुष्यमान कमी होत असून जगणेही असह्य होत आहे. विद्युत, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट यांचा वाढता वापर पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आणत आहे. जैव विविधता धोक्यात आली आहे. समृध्द पर्यावरण माणसाला शाश्वत जीवन देत असते. समाज आणि पर्यावरण ही विकासाची दोन चाके आहेत त्‍यांना चालना देण्यासाठी जैव रसायनांचा व जैव स्त्रोतांचा वापर होणे गरजेचे असल्याचेही त्‍यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे होते. त्‍यांनी पृथ्वी दिनाचे घोषवाक्य पृथ्वीवर गुंतवणूक करा असे आहे. आपण मात्र विकासाच्या नावाखाली अनेक प्रकारची गुंतवणूक केली. पण या सगळयात दुर्दैवाने पृथ्वीच्या आरोग्याकडे लक्ष दिल्या गेले नाही. वसुंधरेच्या बाबतीत सगळया देशांनी व जगातील सर्व नागरीकांनी गंभीर होणे गरजेचे आहे. तरच भविष्यात मानव सुखाने पृथ्वीवर जगू शकतो असे त्‍यांनी सांगितले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके यांनी केले.व्यासपीठावर महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मधूरा सातपूते,प्रा.जयपक्राश सोळंकी होते. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी !

मेहकर तालुक्यात शाळापूर्व तयारी अभियान जोरात
दहा दिवसांनी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष संपणार आहे. महाराष्ट्र दिनी शाळांचे निकाल जाहिर करण्यात येतात. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्षाची नांदी सुरू झाली आहे त्‍यामुळे चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी लागल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील झेडपीच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राखविण्यात येत आहे. पाहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येत आहे हे विशेष. दोन वर्षांपासून शैक्षणिक नियोजन कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झाले होते. पुढील शैक्षणिक वर्षात नियोजन सुव्यवस्थीत व्हावे यासह शिक्षण विभाग सूचना देत आहे. यातचे शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांचा मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेहकर तालुक्यातील अनेक शाळांमधून पूर्वतयारी अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सहा वर्षपूर्ण झालेलया बालकास इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षातील मुलांची यादी शाळांकडून जमा केली जात आहे. सदर यादीतील वयानुसार पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांसाठी उपक्रम घेतले जात आहेत. पालक भेटीतून विद्यार्थ्यां प्रवेशबाबतची परिपूर्ण माहिती घेतली जात आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार सात विविध टप्प्यांवर निरिक्षण केले जात आहे. हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १४ रोजी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी फेरी काढून गावात इयत्‍ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची वजन, उंची, दोरीवरच्या उडया घेवून अभ्यासाविषयाची शैक्षणिक साहित्‍य देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, सरीता पवार, दत्‍तात्रय दशरथे, मिनाक्षी बंगाळे, संदीप पुरी, आशा साखरे यांनी अथक प्रयत्‍न केले. सध्या शाळापूर्व तयारी अभियान घेण्यात आले. प्रवेशसाठी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी पुढील शैक्षणिक वर्षात पहिली वर्गतील प्रवेशपात्र विद्यार्थी आणि पालक मेळाव्यात जनजागृती करण्यात आली. प्रकाश दुनगू, मुख्याध्यापक जि.प.के.म.प्रा.शाळा हिवरा आश्रम असे आहे शाळापूर्व तयारीची टप्पे विद्यार्थ्यांची नोंदणी, विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास, बौध्दिक विकास, विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनिक विकास,विदयार्थ्यांचा भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकाचा सहभाग असे शाळा पर्व तयारीचे टप्पे आहेत.

भगवान महावीरांची करूणा जगाच्या कल्याणासाठी - आर. बी. मालपाणी

विवेकानंद आश्रमात भगवान महावीरांचे पूजन 
 भगवान महावीरांचे जीवन त्‍याग, सेवा, संयम आणि करूणा प्रधान आहे. ते जितेंद्रीय होते. भोगासाठी तडफडणारे इंद्रिय नियंत्रणात ठेवून त्‍यांच्यार विजय मिळविल्यामुळेच ते महावीर ठरले. त्‍यांच्या जीवनात त्‍याग आणि संयम व मानव प्राण्याबद्दलची करूणा व त्‍यासाठी त्‍यांनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग ही काळाची गरज आहे. भगवान महावीरांची क्षमाशीलता व करूणा जगाच्या कल्याणासाठी  व जीवाच्या अस्तित्‍वासाठी महत्‍वाचे साधन बनले आहे असे उदगार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी संस्थेत संपन्न झालेल्या महावीर जयंती निमित्‍त बोलतांना व्यक्त केले. करूणा व क्षमा हे साधुच्या जीवनाचे मुख्य अंग आहे. आज जगात वर्णवर्चस्ववाद, साम्राज्यवाद व विनाशकारी युध्दाचे ढग जमा झालेले असतांना भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा मंत्र मानवाच्या भल्यासाठी तसेच त्‍यांचा जीवो और जीने दो हा संदेश मानव जातीसाठी आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले. चंगळवादी जीवनशैली व विस्तारवादी मानसीकता अन्यायवृत्‍तीला जन्म घालते. प्रेषीतांनी व संतांनी मानवाचा जन्म सत्‍कर्मासाठी, त्‍याग व संयमाच्या कसोटीचे पालन करण्यासाठी असल्याचा उपदेश केला आहे. भगवान महावीरांचे असंख्य अनुयायी त्‍यांच्या या तत्‍वांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. सुरूवातीला आश्रमात असलेल्या भगवान महावीरांच्या प्रतिमेचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रतिमेचे विधियुक्त पूजन करण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते व इतरांनी प्रतिमेचे पूजन केले. दिवसभर आलेल्या भाविकांना त्‍यानिमित्‍त अन्नदान करण्यात आले. 


विवेकानंद आश्रमाची आपुलकी, स्वच्छता व लीनता मनाला भारावणारी- मोडक महाराज

 

वेकानंद  आश्रमात आल्यानंतर मनाला फार आनंद व समाधान झाले. येथे निस्वार्थ बुध्दीने कर्मयोगाचे आचरण सुरू आहे. प. पू. शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या या कर्मभूमीत आढळलेली व्यक्तींमधील लीनता, परिसराची स्वच्छता व आपुलकी मनाला भारावून टाकणारी आहे  असे उदगार स्वामी समर्थ सेवा स्ट कल्याणचे मोडक महाराज यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेट प्रसंगी शनिवारी (ता. 13) रोजी काढले. आश्रमासारख्या मानवसेवा करणाऱ्या संस्थांची देशाला गरज आहे. मानवाच्या भौतिक व आध्यात्मिक कल्याणासाठी स्वामी विवेकानंदांनी केलेल्या उपदेशाचे अनुसरण या ठिकाणी पाहायला मिळाले. कर्मयोग हा सर्वश्रेष्ठ योग असून जीवसेवेसाठी केलेल्या कर्मयोगानेच परमेश्‍वराची प्राप्ती होते व कर्मयोगीच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ उपासक असतो. संस्थेच्या सहकार्यानेच परिसरातील वातावरणात पवित्रतेचा सुगंध दरवळतो आहे. ज्या ठिकाणी सेवा त्याठिकाणी परमेश्‍वराचा वास असतो म्हणून कर्मयोग आचरणात आणल्यानेच वातावरण भक्तीमय होते. आश्रमात बालकांवर होणारे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण असून सदाचारी, स्वावलंबी व संस्कारी बालकच उद्याच्या देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारा ठरणारा आहे. देव, देश आणि धर्मासाठी हवी असलेली चारित्र्यसंपन्न पिढी पुरविण्याचे महत्वाचे कार्य विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून घडत असल्याचे समाधान आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. हरीहरतीर्थावरील नयनरम्य गार्डन, गोशाळा व भव्य मंदिरे यांना त्यांनी भेट दिली. कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारक व संस्थेच्या इतर सेवा उपक्रमांनाही त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्या आगमन प्रसंगी प्रवेशव्दारावर पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, आश्रमाचे विश्‍वस्त शशिकांत बेंदाडे, सुभाष गणगणे,पत्रकार सुनील मिसर तसेच स्वामी समर्थ सेवा स्टचे पदाधिकारी हे उपस्थित होते.