Responsive Ads Here

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

स्त्री भ्रूण हत्या एक बिकट स्वरूप


स्त्री भ्रूण हत्या हि समस्या आज-कालच निर्माण झाली असे नाही 
तर या समस्येला इतिहास आहे,परंतु आजच्या एवढे बिकट स्वरूप पूर्वी या समस्येने धारण केले नव्हते.पुरुष -प्रधान संस्कृती बर्याच प्रमाणात काळ-बाह्य झाली असली तरी विकासाचे ध्येय गाठू शकणार्या मुलीना समाजाने पाहिजे तेव्हढे हक्क प्रदान केले नाही.त्यामुळे समाजाची प्रगती
खुंटली.वास्तविक मुलीना हक्क नाकारणे म्हणजे देशाच्या प्रगतीला नकार देण्यासारखे आहे.फार पूर्वीपासून स्त्री अपत्या विषयीचा आकस समाजात आहे.वेग-वेगळ्या वेळी त्याची वेग-वेगळी कारणे पुढे आली आहे.परंतु स्त्री मुल नको हि या मागची सर्व-साधारण भावना आहे.
मुख्तः ग्रामीण भागातच घडत, म्हणून त्याची दाखल अथवा बोभाटा होत नसे.
परंतु नवीन तंत्र-ज्ञानाने असे अघोरी प्रकार करण्याची गरजच उरली नाही.गर्भातील मुलगी नको असेल तर लगेच गर्भ-पात करून घेऊन सारे कसे
आलबेल आहे असा आभास आता निर्माण केला जातो.मुलीना फक्त भ्रूण-हत्तेलाच तोंड द्यावे लागते असे नाही तर या दिव्यातून त्य बाहेर पडल्या तर आयुष्य भर त्यांना भेद-भावाला तोंड द्यावे लागते..
समानता हा मुल-भूत हक्क घटनेने सर्वाना दिला आहे. मग जन्मा -अगोदर हत्या केली जाणार्या मुलीना जन्म्ण्याचा व जगण्याचा हक्क का
डावलला जातो?कायद्याने गर्भ-पात करण्यची मुभा दिली आहे ,पण मुलगी म्हणून गर्भ-पाताच्या नावाखाली हत्या करण्याची मुभा त्यांना कोणी दिली ?त्यांना सहाय्य करणारे या गुन्ह्यात त्यांचे साथीदार नाहीत का?दुर्देवाची बाब असी आहे कि बर्याच अयादेखील भ्रूण-हत्येची पाठ-राखण करणाऱ्या आहेत.त्यामुळे हि समस्या फार जटील झाली आहे,आणि त्यावर रामबाण तोडगा शोधून काढणे अवघड होऊन बसले आहे.युनोच्या अहवालानुसार दरवर्षी ७५०००० भारतात मुलींची भ्रूण-हत्या होते.

संतोष थोरहाते,
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम.ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा