Responsive Ads Here

बुधवार, २० मार्च, २०१९

वृक्ष संवर्धनाने होळी साजरी करावी - संतोष गोरे


निसर्ग आपल्या सतत शिकवित असतो. माणसे आपआपसात भेद निर्माण करतात. माणसे माणसात दरी निर्माण करतात. नदीचे पाणि सर्व जाती धर्मासाठी उपलब्ध असते तेथे भेद नसतो. तो संस्कार आपल्या निर्माण व्हावा. विकास करतांना निसर्गाचा -हास होतो. निसर्गाचा -हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेच आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाने होळी साजरी करावी असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना काढले.
विवेकानंद आश्रमात दरवर्षी होळी सण वृक्ष पूजन करून साजरा करण्याची परंपरा गत अनेक वर्षापासून  कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी घालून दिली आहे. वृक्षांचे संवर्धन व्हावे, निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे. वृक्ष पूजन करून त्यांना आपलेसे करावे ही  भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी दरवर्षी प्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या सणानिमित्त  बुधवारी ता.२० रोजी वृक्ष पूजनाचा कार्यक्रम विवेकानंद आश्रमात आयोजित करण्यात आला होता.
सकाळी दहा वाजता कर्मयोगी संत .पू. शुकदास महाराजश्रींच्या निवासस्थानाजवळ लागून असलेल्या बकुळ वृक्षाचे विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पूजन करण्यात आले. विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, पत्रकार समाधान म्हस्के, संतोष थोरहाते, श्रीराम मानघाले आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संतोष गोरे म्हणाले की, होळीच्या दिवशी होळी करायची असल्यास दुर्गूणांची होळी करा. कुविचारांची होळी करून सुविचारी बनावे. रंग पंचमी साजरी करतांना कृत्रिम रंगाचा वापर करता पर्यावरण पूरक सभ्यतेने रंगपंचमी साजरी करावी असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्की तिरके तर आभार प्रा.प्रतिक उगले यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राध्यापक,प्राध्यपकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प

आम्ही होळी उत्सावात कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी करणार नाही. वृक्ष संगोपन संवर्धनासाठी कटीबध्द राहू.पर्यावरण रक्षणाच्या प्रचार,प्रसारासाठी प्रयत्नशील राहू.रंगपंचमीच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या घातक रसायनयुक्त रंगांचा वापर करणार नाही. नैसर्गीक रंगांचा वापर करू असा संकल्प विद्याथ्र्यांनी केला.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा