देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. आज देशातील 12 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. दरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरा-नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावे आणि मतदान करावे असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदान केले पाहिजेत. मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचे हात बळकत होतात. मतदाना बाबत अजून सुध्दा पाहिजे तेवढया प्रमाणात जागृती झाली नाही.लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी ता. २६ रोजी पार पडले. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्त्री,पुरूष,जेष्ठांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.बोहल्यावर चढयाआधीच नवरदेव नवरीने सुध्दा आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र दिसून आले. मेहकर तालुक्यातील ब्रह्मपूरी येथील माजी पंचायत समिती सदस्य गजाननदादा पाटील यांचे चिरंजीव अक्षय गजानन म्हस्के या नवरदेवाने सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव अक्षय म्हस्के यांची होणारी अर्धांगिनी वर्दडा येथील डिगांबर आसाबे यांची कन्या चि.सौ.कां.तेजल डिगांबर आसाबे हीने सुध्दा सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला हिवरा आश्रम परिसरात सुध्दा सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरीकांचा मोठा उत्साह दिसून आला.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
आधी लगीन लोकशाहीचं ! मंडपात जाण्यापूर्वी नवरी - नवरदेव मतदान केंद्रावर
देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. आज देशातील 12 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. दरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरा-नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावे आणि मतदान करावे असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदान केले पाहिजेत. मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचे हात बळकत होतात. मतदाना बाबत अजून सुध्दा पाहिजे तेवढया प्रमाणात जागृती झाली नाही.लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी ता. २६ रोजी पार पडले. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्त्री,पुरूष,जेष्ठांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.बोहल्यावर चढयाआधीच नवरदेव नवरीने सुध्दा आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र दिसून आले. मेहकर तालुक्यातील ब्रह्मपूरी येथील माजी पंचायत समिती सदस्य गजाननदादा पाटील यांचे चिरंजीव अक्षय गजानन म्हस्के या नवरदेवाने सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव अक्षय म्हस्के यांची होणारी अर्धांगिनी वर्दडा येथील डिगांबर आसाबे यांची कन्या चि.सौ.कां.तेजल डिगांबर आसाबे हीने सुध्दा सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला हिवरा आश्रम परिसरात सुध्दा सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरीकांचा मोठा उत्साह दिसून आला.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
विवेकानंद कृषि महाविद्यालय देशभक्तीच्या घोषवाक्यांनी दुमदुमले !
ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य प्राप्त होवून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव आहे. यानिनित्ताने शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविल्या जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत येथील निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी शनिवारी ता.१३ रोजी हर घर तिरंगा जनजागृती अभियान रॅली आयोजन करण्यात आले होते . विवेकानंद कृषि महाविद्यालय परिसरात सकाळी ७.३० वाजता विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढली. या रॅलीत विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी,विद्यार्थीनींनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत गावामध्ये हर घर तिरंगा अभियानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. यावेळी घर हर मे तिरंगा हर मन तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान, चला घरोघरी तिरंगा फडकू स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठया अभिमानाने,हर्ष आणि उल्हासाने सर्व मिळुन साजरा करू या, तिरंगा आपला भारतीय ध्वज उंच उंच फडकवू चला देशासाठी लढुन याची आणखी शान वाढवूच्या घोषणांनी हिवरा आश्रम परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीच्या घोषवाक्यांनी परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. रॅलीमध्ये शैक्षणिक विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवसाय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मंगेश जकाते.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशिल दळवी,कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतिक उगले यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
विवेकानंद आश्रमात आदिवासी दिन उत्साहात
दरवर्षी
विवेकानंद आश्रमात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी मंळवारी (ता. ९
) रोजी आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद
आश्रमात विविध जाती धर्माचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तायुक्त शिक्षण,
स्वावलंबी जीवन, निसर्गरम्य व धर्माष्ठित परिसर यामुळे येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची
पहिली पसंती असते. विवेकानंद ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख
पाहूणे म्हणून डॉ.शाम ठोंबरे हे होते. सुरूवातीला परिसर स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या
विविध स्पर्धा या प्रसंगी आयोजित करण्यात आल्या. सायंकाळी व्यासपीठावर झालेल्या सांस्कृतिक
कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते
करण्या आले. आदिवासी समाज हा या देशाचा मुळ निवासी असून जल,जमीन आणि जंगल या घटकांचे
रक्षण करत आहेत. आदिवासींचे सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृध्द असून राष्ट्रभक्ती ही
या समाजाचे गुणधर्म आहे. इंग्रजा विरूध्द लढतांना या समाजाने बिरसा मुंडा सारखे थोर
क्रांतीकारक या देशाला दिले. आज या समाजातील विद्यार्थी आधुनिक शिक्षण घेवून जगाशी
स्पर्धा करण्यात समर्थ आहेत असे विचार डॉ.शाम ठोंबरे यांनी काढले. निष्काम कर्मयोगी
संत प.पू.शुकदास महाराजांनी आपल्या सेवा कार्याची सुरूवात आदिवासींच्या जंगल्यातील
वाडी वस्त्यांवर जाऊन केली. त्यांना आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांचे पुरताता करण्यासाठी
प्रयत्न केले. अनेक आदिवासी गावे विवेकानंद आश्रमाने विकासासाठी दत्तक घेतली,आज त्या
गावाचा मोठया प्रमाणात परिवर्तन दिसून येत आहे ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासींचे नृत्य,त्यांची कला तसेच
बिरसा मुंडा यांच्या जीवनावर समायोचित भाषणे केली. कार्यक्रमासाठी डॉ. दिपक जामकर,
विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे,
सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, विद्या मंदिराचे प्राचार्य आर.
डी. पवार, विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या प्रणिता गिऱ्हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रांत राजपूत यांनी
केले. कार्यक्रमासाठी विवेकानंद ज्ञानपीठचे व वसतिगृहातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी
मोठया संख्येने उपस्थित होते.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
विवेकानंद आश्रम परिसर माणूस घडविणारा- तहसिलदार डॉ.संजय गरकल
शिक्षण माणसाला शहाणपण देते,सुज्ञपणा देते,लोकशाही मूल्यांची व विधायक कार्यासाठी लागणारी वर्तनक्षमता शिक्षणाने प्राप्त होते. शैक्षणिक दृष्टया अत्यंत सुयोग्य असलेला हा परिसर आहे. या ठिकाणी शिक्षणासोबत इतर मूल्यांची बांधलकी जोपासत सुजान नागरीक तयार होतो. कारण विवेकानंद आश्रमाचा परिसर हा माणूस घडविणारा आहे असे विचार मेहकरचे तहसिलदार डॉ. संजय गरकल यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता.८) रोजी पदवी वितरण बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. डी. पाटील होते. पदवीनंतर उच्चशिक्षण घेवून विविध क्षेत्रात करीयर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रमाची कास धरावी. सेवाक्षेत्रात काम केल्याने देशाची सेवा घडते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सव वर्षात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. अमरावती विद्यापीठाच्या संग्लनीत असलेले हे महाविद्यालय गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वदूर परिचीत आहे. शिक्षणासोबतच स्वावलंबन,संस्कार या गुणांची पायाभरणी महाविद्यालयीन जीवनातच होत असल्याने विद्यार्थी जीवनात यशस्वी होत आहेत. यावर्षीच्या गुणवत्ता यादीत मुलींची संख्या जास्त असल्याचे समाधान आहे असे विचार प्राचार्य डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व पाहूण्यांच्या स्वागतांने झाली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विषयांच्या १०९ विद्यार्थ्यांना पदवी वितरण कारण्यात आली. शाम शेळके व प्रतिक्षा गवई या पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा व प्रात्यक्षिक परिक्षांचा सराव अत्यंत उपयुक्त ठरला असून भविष्यात पदव्युत्तर पदवीसाठी त्यांचा उपयोग होणार आहे. स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनाचा लाभही या महाविद्यालयातून झाला असून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील,प्रा.जयप्रकाश सोळंकी तथा सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन वैष्णवी बोरकर,अनुजा चंद्रवंशी तर आभारप्रदर्शन इश्वरी आमले हीने केले.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
विवेकानंद आश्रमात बुध्द पौर्णिमा साजरी
विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी करण्यात आली. विवेकानंद आश्रमात भगवान बुध्दाच्या प्रतिमेसमोर भाविक जमा झाले होते. सकाळी ८ वाजता झालेल्या पूजनाच्या कार्यक्रमात सर्व प्रथम परिसराची स्वच्छता करण्यात आली. आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भगवान बुध्ददेवांनी संपूर्ण जगाला शांती आणि करूणेचा संदेश दिला. सर्व जीवांशी करूणेच्या भावनेतून वागणूक निर्माण झाली तर सर्व व्देष आणि शत्रूमुक्त जीवन जगतील. परस्परांचे सहजीवन चारित्र्य नावाच्या मूल्यांने जोडले गेल्यास ते जीवन सुखी आणि सार्थकी होईल असे विचार संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले. भगवान बुध्दांच्या जीवनातील सर्व पैलू व त्यांचा उपदेश विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातून व प.पू.शुकदास महाराजांच्या चरित्रातून आढळतो. मानवाचे कल्याण हाच बुध्दतत्वज्ञानाचा पाया आहे. समाजाची सेवा करण्यासाठी विवेकानंद आश्रमात सुरू झालेले सेवाउपक्रम ही खरी उपासना असल्याचे प्रतिपादन शिवाजीराव घोंगडे यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्य आर.डी.पवार,डी.भास्कर महाराज,अशोक गिऱ्हे व माजी नायब तहसिलदार बी.टी.सरकटे यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला आश्रमाचे पदाधिकारी व परिसरातील नागरीक मोठया उपस्थित होते.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत


