Responsive Ads Here

मंगळवार, १७ मे, २०२२

विवेकानंद आश्रमात बुध्द पौर्णिमा साजरी

 


विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी करण्यात आली. विवेकानंद आश्रमात भगवान बुध्दाच्या प्रतिमेसमोर भाविक जमा झाले होते. सकाळी ८ वाजता झालेल्या पूजनाच्या कार्यक्रमात सर्व प्रथम परिसराची स्वच्छता करण्यात आली. आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भगवान बुध्ददेवांनी संपूर्ण जगाला शांती आणि करूणेचा संदेश दिला. सर्व जीवांशी करूणेच्या भावनेतून वागणूक निर्माण झाली तर सर्व व्देष आणि शत्रूमुक्त जीवन जगतील. परस्परांचे सहजीवन चारित्र्य नावाच्या मूल्यांने जोडले गेल्यास ते जीवन सुखी आणि सार्थकी होईल असे विचार संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले. भगवान बुध्दांच्या जीवनातील सर्व पैलू व त्‍यांचा उपदेश विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातून व प.पू.शुकदास महाराजांच्या चरित्रातून आढळतो. मानवाचे कल्याण हाच बुध्दतत्‍वज्ञानाचा पाया आहे. समाजाची सेवा करण्यासाठी विवेकानंद आश्रमात सुरू झालेले सेवाउपक्रम ही खरी उपासना असल्याचे प्रतिपादन शिवाजीराव घोंगडे यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्य आर.डी.पवार,डी.भास्कर महाराज,अशोक गिऱ्हे व माजी नायब तहसिलदार बी.टी.सरकटे यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला आश्रमाचे पदाधिकारी व परिसरातील नागरीक मोठया उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा