जनावराच्या आजार प्रतिबंधासाठी लसीकरणाची गरज

पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उदभवतात.  या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनावरांचे लसीकरण  करणे महत्वाचे आहेग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना जनावरांच्या आजारा बाबत माहिती होण्यासाठी दृष्टी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थींनीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम हिवरा आश्रम येथील शेतक-यांना लसीकरणाचे महत्व पटवून दिलेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुप मध्ये प्रज्ञा बागडे,जुही परचाके,भावना सरोदे,वैष्णवी बोर्डे,शिवगंगा मिसाळ,स्नेहल घुगे,कांचन सिरसाट,काजोल  पाटील,नितु जुनघरे  या विद्यार्थीनींचा समावेश आहेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडकेप्रा.मंगेश जकातेप्रा.मिनाक्षी कडू, डॉ.प्रा.भानुदास भोंडेपर्यवेक्षक डॉ.सुनिल देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे.  शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात पशूंचे पालन करतोपशुधन संगोपनाचा त्याला जोडधंदयासाठी मोठया प्रमाणात उपयोग होतोग्रामीण भागातील शेतक-याला पशूच्या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे तो जनावरांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतोशेतक-यांनी जनावरे आजारी असल्यास त्यांचा शेती कामावर सुध्दा परिणाम होतोदुधाळ जनावर आजारी असल्यास त्याचा दुध उत्पादनावर परिणामी दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागतोविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थींनी परिसरातील  शेतक-याना लसीकरणाचे महत्व यावेळी पटून दिले.

पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प,फऱ्या,पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतातदमट वातावरणात घटसर्पासारखे श्वसनाचेआजार जास्त प्रमाणात दिसून येतात .या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होतेखालच्या जबड्याखाली सूज येतेश्वासोच्छ्वास करायला त्रास होतो,जनावरांस  १०४ ते १०५ अंश फॅरेनहाईट ताप येतोसंसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.

प्रप्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्याच्या सुरवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी. त्याच प्रमाणे फऱ्या,पायलाग,काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे.

जनावरांच्या आरोग्यासाठी लसिकरणाची गरज
पावसाळयात जनावरांना होणाèया रोगापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी जनावरांना लसिकरण करणे अत्यंत आवश्यक असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करण्यात येते. दरवर्षी पावसाळया आधी मे किंवा  जून महिन्यामध्ये जनावरांना लसीकरण करणे आवश्यक असते.

शेती पशूधन यांचे अतूट नाते आहे.पशूधनाशिवाय शेतीकरणे कठीण आहे. पशूधनापासून मिळणाèया उत्पान्नात वाढ करण्यासाठी जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे असते. नियमीत जनावरांचे लसीकरण केल्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
                                                                   प्रा.मिनाक्षी कडू, विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

युरिया चारा उपचार पध्दती ठरते जनावरांसाठी वरदान


शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पाहतात. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शेतीसोबत दुध व्यवसायाकडे मोठया प्रमाणात कल वाढल्याचे दिसून येत आहे. शेतीसोबत दूध व्यवसायाने त्यांना मोठा आर्थिक लाभ होतो. चारा हा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सकस चा-यामुळे जनावरांचे पोषण होऊन दूध देण्याच्या क्षमतेत वाढ होते. चा-याची पौष्टिकता वाढीसाठी चारा जास्त दिवस टिकण्यासाठी चा-यावर युरिया पध्दतीने प्रात्यक्षिक विवेकानंद  कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनींनी हिवरा बु येथे शेतक-यांना करून दाखविले.
यावेळी संदीप बोरे,सखाराम दळवी,अशोक शेळके,विजय बोरे,किसन खाटोवकर,सरीता दळवी,वच्छला दळवी,शेवंताबाई गायकवाड,गोदावरी बोरे,शोभा खाटोवकर,सविता पवार  यांचे सह परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. चा-यावर युरीया उपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळतात. या चा-यामुळे  जनावरांच्या पोटातील नायट्रोजन हा प्रोट्रिनमध्ये रूपांतरीत होतो. तसेच कार्बोहायड्रेट लवकर पचत नसल्यामुळे युरिया चारा खाल्याने योग्य परिणाम दिसून येतो. हा चारा खाल्याने जनावरांची पचनशक्ती वाढते पचनक्रिया सुरळीत होते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या जय जिजाऊ ग्रुप हर्षा पवार,आरती उईके,दिपाली गि-हे,माधवी वाका,मानसा पोलेरू, अश्विनी इंगळे,योगिता राठोड,अश्विनी घुगे,सलोनी लड्डा,भारती नंदापुरे या विद्यार्थीनींचा ग्रुपमध्ये  समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.मंगेश जकात  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अशी आहे युरिया चारा उपचार पध्दती
शेतक-यांनी प्रथम १०० किलो गव्हाचे कुटार ताडपत्रीवर टाकावे. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडावे .त्यानंतर ४० लिटर पाण्यामध्ये किलो युरिया,१० किलो गुळ आणि किलो मिळ यांचे मिश्रण एकरूप होईपर्यंत हलवावे. हे मिश्रण गव्हाच्या कुटाराच्या थरा वरती फवारावे. पुन्हा एक गव्हाच्या कुटाराचा थर करून त्यावर हे मिश्रण फवारावे. हा गव्हाचा चारा २५ ते २८ दिवस झाकून ठेवावा.

दुधाळ जनावरांसाठी वरदान
युरीया उपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळतात. या चा-यामुळे  जनावरांच्या पोटातील नायट्रोजन हा प्रोट्रिनमध्ये रूपांतरीत होतो. तसेच कार्बोहायड्रेट लवकर पचत नसल्यामुळे युरिया चारा खाल्याने योग्य परिणाम दिसून येतो. चारा हा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सकस चा-यामुळे जनावरांचे पोषण होऊन दूध देण्याच्या क्षमतेत वाढ होते. 

वाळलेला वा-यामध्ये पोषकतत्वाचे प्रमाण कमी असते. आणि युरीया उपचारीत चा-यामध्ये पोषकतत्व जास्त प्रमाणात असते. उपचारीत चा-यामुळे दुधाची आणि वासराची वाढ झपाटयाने होते.
हर्षा पवार,विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनी शेतकरी बांधवाना युरिया चार उपचार पद्धतीचे प्रात्यक्षित करून दाखविले. त्यांचा परिसरातील शेतक-यांना खूप लाभ होत आहे.जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनी परिसरातील शेतक-यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देत आहे.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८