'स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी' ठरणार विवेकानंदांचा सर्वाधिक उंच पुतळा!


स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांचा ग्रामीण भागात प्रचार प्रचाराचे अद्भूत काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आयुष्यभर केले. जगभरातील युवकांसाठी विवेकानंद आश्रम प्रेरणाकेंद्र बनले आहे. विवेकानंद आश्रम हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले असून, वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी आश्रमास भेट दिली आहे. आश्रमाच्यावतीने कोराडी नदीच्या जलाशयात स्टॅच्यु ऑफ ह्युमिनिटी या विवेकानंद स्मारकाचे निर्माण कार्य सुरु असून, या स्मारकावरील विवेकानंदांचा पुतळा हा तब्बल ४० फूट उंचीचा राहणार आहे. विवेकानंदांच्या आजपर्यंतच्या पुतळ्यांत हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.
कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे पू. शुकदास महाराज यांचे भव्य स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षाच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी या विवेकानंद स्मारकावर येर्णाया प्रत्येकाला विवेकानंदांच्या कार्याचा परिचय व्हावा. पू. शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतील ध्यानधारणा त्यांनी करावी व नैसर्गिक वनराईच्या सानिध्यात त्यांना आत्मबोध व्हावा, यासाठी विवेकानंद आश्रम तब्बल तीन कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चात हे विवेकानंद स्मारक साकारत आहे.

तीन लाख पर्यटकांनी दिल्या भेटी
विवेकानंद स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने विवेकानंद आश्रम व हरिहरतीर्थ येथे भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटीसही आवर्जुन भेट देत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर, हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारकास भेट दिली.

असे राहणार स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी स्मारक
 स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी असे या स्मारक प्रकल्पाचे नाव राहणार असून या स्मारकावर विवेकानंदांचा भव्य आणि अतिउंच असा पुतळा उभारला जात आहे. सद्या येथे १५ फूट उंचीचा पुतळा असून, त्याची उंची ४० फूट केली जाईल, तसेच, ध्यान केंद्र, नैसर्गिक वनराई आणि नारळाच्या झाडांची बाग असे या स्मारकाचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे समुद्रकिना-यावर बसून ध्यान करत असल्याचा अनुभव पर्यटकांना येणार आहे.

६ एकरावर साकारणार भव्य विवेकानंद स्मारक
कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे पू. शुकदास महाराज यांचे भव्य स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्‍वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षाच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

युवकांसाठी विवेकानंद स्मारक ठरणार उर्जास्त्रोत
स्वामी विवेकानंद यांचे चरित्र व ओजस्वी विचारांचा फार मोठा प्रभाव जगभरातील युवकांवर आहे. विवेकानंद आश्रम कोरडी जलाशयात सहा एकराच्या बेटावर नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक साकारत आहे. या विवेकानंद स्मारकाला भेटी देण्यासाठी जगभरातून युवक मोठ्या संख्येने विवेकानंद आश्रमात येईल. 'स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी' हे जगभरातील युवकांचे उर्जास्त्रोत ठरणार आहे.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

विवेकानंद आश्रम देणार शेतक-यांना मोफत कृषिसल्ला !



बुडते हे जन देखवेना डोळा बुडत। म्हणोनि कळवळा येतो आम्हां या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संतांनी वेळोवेळी समाजाच्या हिताचाच विचार केला. समाजाची अधोगती होऊ नये म्हणून त्यांना वेळोवेळी हितोपदेश केला.या न्यायाने कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज यांनी एका दशका अगोदरच सेंद्रिय शेतीची कास धरा असे शेतकरी बांधवांना आवाहन केले होते. विषमुक्त  अन्न पिकविण्यासाठी व त्याकरिता ग्रामीण भागातील शेतक-यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला असून, विवेकानंद कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मोफत कृषी सल्ला व सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी व उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी दिली आहे. 
रासायनिक खतांचा झालेला अतिरेकी वापर, पिकांवर फवारणी करण्यात आलेली कीड व कीटकनाशके यांचा अंश पिकांत उतरून माणसे कर्करोगाची भक्ष्य झाली आहेत, असा सिद्धांत कर्मयोगी संत तथा कृषितज्ञ प. पू. शुकदास महाराज यांनी दशकभरापूर्वी  मांडला होता. 
समाजाचे स्वास्थ्य चांगले रहावे, विषमुक्त अन्नाची निर्मिती व्हावी, यासाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालयामार्फत मोफत कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु केल्या जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मंगळवार ता.७ रोजी हे केंद्र विवेकानंद आश्रमाच्या परिसरातील कृषी महाविद्यालयात सुरु होत आहे. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांकडे येणा-या बहुतांश कॅन्सर रुग्णांचा त्यांनी अभ्यास केला असता, त्यांच्या असे निदर्शनास आले, की कॅन्सरसाठी भाजीपाला, कडधान्ये व फळे यांच्यामार्फत पोटात गेलेले विषारी घटक, कीड व कीटकनाशकांचे अंश हे त्याला कारणीभूत आहेत. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि जंतुनाशकांची केली गेलेली फवारणी आणि रासायनिक खतांचा झालेला वापर व त्यातील रसायने धान्ये, भाज्या व फळांमध्ये उतरतात. हे अंश अन्नाद्वारे खाण्यातून रक्तापर्यंत पोहोचतात. त्यांचा रक्तघटक आणि रक्तातल्या पेशींवर परिणाम होतोव त्यातून कर्करोग होतो, असे पू. शुकदास महाराज यांनी सांगितले होते.

तज्ञ प्राध्यापक करणार मार्गदर्शन 
विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे तज्ज्ञ प्राध्यापक सकाळी ८ ते ९ व सायंकाळी ५ ते ६ यावेळात शेतकèयांना मोफत मार्गदर्शन करणार आहेत. त्यात कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रा. एस. पी. काकडे (९९६०६८६१८२) व डॉ. बी. एन. भोंडे (८३७८८४४८४८), वनस्पती विकृती शास्त्र विभागाचे प्रा. व्ही. बी. हमाने (९५५२१६९६५८) व आर. आर. काळे (९६८९३३३९६६), तर कृषी विद्या विभागाचे प्रा. एस. डी. जाधव (८८०५३१३९०९) यांचा मार्गदर्शक मंडळात समावेश आहे.

ग्रामीण कृषक पुत्रांना मिळणार कृषी सल्ला 
समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेती करण्यावर भर द्यावा हि कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांची इच्छा होती. विषमुक्त अन्नाची निर्मिती व्हावी, यासाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालयामार्फत मोफत कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु केल्या जात आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर (दि.७ मे) हे केंद्र विवेकानंद आश्रमाच्या परिसरातील विवेकानंद कृषी महाविद्यालयात सुरु होत आहे. या केंद्रामार्फत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात येणार असून, माती व पाणी परीक्षण करण्यात येऊन मातीचा पोत पाहून कृषी निविष्ठाविषयक सल्लाही देण्यात येणार आहे.
  
सेंद्रिय खते पुरविण्यासाठी आश्रमाचा पुढाकार 
विवेकानंद आश्रमाच्या तब्बल दीडशे एकर शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांनी बासमती गहू, पिवळी ज्वारी यासह काही वाणांचे संशोधन केलेले आहे. तब्बल दीडकोटी रुग्णांना व्याधीमुक्त करणारे ते उत्कृष्ट डॉक्टरही होते. त्यांच्याकडे येणार्‍या बहुतांश कॅन्सर रुग्णांचा त्यांनी अभ्यास केला असता, त्यांच्या असे निदर्शनास आले, की कॅन्सरसाठी भाजीपाला, कडधान्ये व फळे यांच्यामार्फत पोटात गेलेले विषारी घटक, कीड व कीटकनाशकांचे अंश हे त्याला कारणीभूत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाना विषमुक्त शेती करण्याची प्रेरणा देण्यासाठी विवेकानंद आश्रम सेंद्रिय खते अल्प दरात उपलब्ध करून देणार आहे.


कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या संकल्पनेतील सेंद्रिय शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत कृषी सल्ला व माफक दरात कृषी निविष्ठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय विवेकानंद आश्रमाने घेतला आहे.
                                      संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



दुष्काळात खळखळला माणूसकीचा झरा !



दामोधर गारोळे यांच्या याच शेतातील विहीरीतून
 शास्त्री नगरातील नागरिकांना 
केला जातो मोफत पाणी पुरवठा 
दुष्काळाच्या गडद छायेने महाराष्ट्र होरपळून निघत असतांना विहिरीच्या पाण्याने गाठलेल्या तळाने पाण्याच्या एका थेंबासाठी महिलावर्गाची होणारी परवडीचे वृत्त वृत्तपत्रातून नियमीत वाचण्यात येते. मात्र कोराडी जलप्रकल्प जवळ असतांना सुध्दा हिवरा आश्रम येथे मेहकर चिखली  रस्ता रूंदीकरणा दरम्यान जेसीबीच्या खोदकामात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी  खंडीत झाल्यामुळे हिवरा आश्रम वासियांना गेल्या २५ ते ३० दिवसापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची बाब लक्षात घेऊन पाण्याविना होणारे नागरीकांची हेळसांड लक्षात घेत हिवरा आश्रम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच दामोधर संपत गारोळे यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईप लाईन टाकून शास्त्री नगराला पाणी पुरवठा करून आपल्या सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवून आणले. गेल्या २५ ते ३० दिवसापासून नागरीकांची होणारी पाण्यासाठी पायपीटाला यानिमित्ताने पूर्ण विराम मिळाल्याने नागरीकांमध्ये महिलामंडीळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दामोधर गारोळे यांचे शेत गावापासून किमी अंतरावर आहे. त्यांनी स्वतःच्या विहिरीवरून ३० ते ३५ पाईप टाकून शास्त्री नगराला पाणी पुरवठा केला आहे. गेल्या एक महिन्यापासून भिमनगर,वार्ड क्र.,वार्ड क्र. मध्ये पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. कोराडी धरणामध्ये जलसाठा असून देखील पाणी मिळणे कठीण झाले आहे. तरी संबंधीत ठेकेदारांनी तोडलेली पाईप लाईन लवकरात लवकर जोडून देण्यात यावी अशी मागणी यानिमित्ताने जोर धरीत आहे. या सामाजिक बांधीलकीमुळे दामोधर गारोळे यांचे कौतुक होत आहे.

 नागरिकांची होणारी पाण्यासाठी होणारी परवड लक्ष्यात घेऊन मोफत पाणी वाटपाचा निर्णय घेतला. जोपर्यंत रस्त्याचे काम काम सुरू आहे तोपर्यंत नागरीकांना नियमीत तिस-या दिवशी पाणी पुरवठा करू.

                                              दामोधर गारोळे हिवरा आश्रम


सामाजिक बांधीलकीचे दर्शन 
नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट  व त्रास लक्षात घेत हिवरा आश्रम येथील दामोधार गारोळे यांनी आपल्या शेतातील विहीरीवरुन पाईप लाईन द्वारे शास्त्री नगरातील नागरिकांची मोफत पाणी वाटप करून पाण्याची समस्या दूर केली. 

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहभेटीने फुलणार विवेकानंद आश्रम


ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना  शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रम या छोट्या शाखेड्यात  १९८२ मध्ये विवेकानंद विद्या मंदिर सुरू केले. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असलेला तरुण निर्मितीसाठी विवेकानंद विद्या मंदिराने कटाक्षाने लक्ष दिले.  १९८२ ते २०१८ पर्यंत जे माजी विद्यार्थी याशैक्षणिक संकुलात शिकून गेलेत, त्यांचा गेट टू गेदर चा मित्रमेळा हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय विवेकानंद आश्रमाने घेतला आहे. विवेकानंद आश्रमात ९ जून २०१९ रोजी  विवेकानंद आश्रमात  सर्व माजी  विद्यार्थ्यांचा मेळा भरणार आहे.
विवेकानंद आश्रमाच्या वसतिगृहातील  विद्यार्थ्यांची दिनचर्या म्हणजे भावी आदर्श व्यक्तिमत्वाचा परिपाकच होय. विवेकानंद विद्या मंदिरातून शिक्षण घेणा-या  विद्यार्थ्यांना सदाचार,नीतीमूल्य,चारित्र्यसंपन्न,कर्तव्यदक्षता सोबत व्यावहारीक जीवनाचे धडेशिकविले जातात. कर्मयोगी प. पू. शुकदास महाराजश्री यांनी हिवरा आश्रम या खेड्या गावाच्या माळरानावर स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमाने राज्यसह जगभरात ओळख निर्माण केली आहे. १९८२ ते २०१८ या वर्षातील इयत्ता दहावी, इयत्ताबारावीची बॅच असलेल्या माजी  विद्यार्थ्यांचा हा गेट टू गेदर कार्यक्रम विवेकानंद आश्रमात दिनांक ९जून२०१९ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.  विवेकानंद आश्रमात आलेल्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत सेल्फी फोटो,ग्रुप फोटो काढण्यासाठी सेल्फी पार्इंट सुध्दा राहणार आहे.

३६ वर्षानंतर होणार मित्रांच्या भेटीगाठी
शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही कर्मयोगी संत शुकदास महाराजांची शिक्षणाची अत्यंत साध्या सरळ सोप्या शब्दात केलेली व्याख्या. मुलांना शिकवितांना ते कळेपर्यंत शिकवा हा महाराजश्रींचा आग्रह असे.विवेकानंद आश्रमाच्या विद्या मंदिरात शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना विवेकानंद आश्रमची झालेली प्रगती माहिती व्हावी,जुन्या मित्रांना पुन्हा भेटा यावे यासाठी गेट टू गेदरसाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला आहे,
 
माजी विद्यार्थी कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर
गेल्या ३६ वर्षांत विवेकानंद शैक्षणिक संकुलात शिकलेले विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर आणि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. राजकारण, समाजकारण, वैद्यकीय, सेवा, सहकार, पत्रकारिता, संरक्षण या सर्वच क्षेत्रांत या  विद्यार्थ्यांनी आपले नावकमावलेले असून आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक अग्रेसर आहेत.

बरेच विद्यार्थी प्रदीर्घ काळापासून विवेकानंद आश्रमातही आलेले नाहीत. त्यामुळे या सर्व  विद्यार्थ्यांना विवेकानंद आश्रमात पाचारण करून त्यांना विवेकानंद आश्रमाची झालेली प्रगती, भविष्यातील नियोजन आणि प. पू. शुकदास महाराजश्रींच्यासंकल्पाच्या पूर्ततेसाठी हवे असलेले त्यांचे सहकार्य याबाबत अवगत करून देण्यासाठी हे गेट टू गेदर ठेवण्यात आलेले आहे. विविध क्षेत्रात काम करर्णाया या माजी  विद्यार्थ्यांचा परिचयही एकमेकांना करून दिला जाणार आहे.                                                                       संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



विवेकानंद आश्रमाच्या अन्नपुर्णेत सेंद्रीय भाजीपाल्याला प्राधान्य


रासायनिक खते किटक नाशकांचा अतिरेकी वापर सेंद्रीय शेती करण्याकडे  कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी प्राधान्य दिले. गोर गरीबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पोष्टीक,सकस अन्न मिळावे या हेतूने कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असा अन्नपुर्णा विभाग सुरू केला. या विभागात तीस ते चाळीस कर्मचारी करीत असून  विवेकानंद ज्ञानसंकुलातील विविध शाळा, महाविद्यालयांतील वसतीगृहात राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या अन्नपुर्णा विभागात सकस अन्नपदार्थ तयार केले जातात. विशेष बाब म्हणजे, भाजीपाला हा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला वापरला जातो. आश्रमाच्या अन्नपुर्णा विभागात दररोज दोन क्विंटल भाजीपाला वापरला जातो. त्यात पालक, फुल फळ कोबी, वांगे, मेथी, शेपू यांचा समावेश असतो. विशेष बाब  सेंद्रीय भाजीपाला विवेकानंद आश्रमाच्या शेतातच पिकविण्यात आलेला असतो. क्विचित प्रसंगी तो बाजारपेठेतून खरेदी केला जातो. महिन्याकाठी सरासरी ६० क्विंटल भाजीपाला लागत असतोविद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी सकस, सेंद्रीय पौष्टिक अन्नाच्या निर्मितीत अजिबात कसर केली जात नाही.
वाढत्या वयातील विद्यार्थ्यांना पुरेसे पोषणमूल्ये मिळतील, याची काळजी घेतली जाते. जेणेकरून  विद्यार्थी-विद्यार्थिनींची शारीरिक मानसिक वाढ योग्यरित्या होईल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे विवेकानंद आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
विवेकानंद आश्रमाद्वारे संचालित ज्ञानसंकुलात विवेकानंद विद्या मंदीर ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद कृषी कृषी व्यवस्थापन महाविद्यालये, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची शाळा, कॉन्व्हेंट  आदी शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. या सर्व शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी सरासरी तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी या वसतीगृहात निवासी असतात. या विद्यार्थी -विद्यार्थिनींना अतिशय माफक दरात भोजन सुरक्षित, सुविधापूर्ण निवासाची सोय विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात येते.

महिन्याकाठी लागतो ६० क्विंटल भाजीपाला
आश्रमाच्या अन्नपुर्णा विभागात दररोज दोन क्विंटल भाजीपाला वापरला जातोत्यात पालकफुल  फळ कोबीवांगेमेथीशेपू यांचा समावेश असतोविशेष बाब  सेंद्रीय भाजीपाला विवेकानंद आश्रमाच्या शेतातच पिकविण्यात आलेला असतोक्विचित प्रसंगी तो बाजारपेठेतून खरेदी केला जातोमहिन्याकाठी सरासरी ६० क्विंटल भाजीपाला लागत असतो

विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक प्रबोधन
विवेकानंद आश्रमाच्या अद्यावत अन्नपुर्णा विभागात एकाच वेळी  हजार विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. भोजना अगोदर अन्नसंस्कार केले जातात. भोजनापूर्वी विविध संस्कृत सुक्ते, गीतेतील अध्याय आणि आध्यात्मिक प्रबोधन केले जाते. या उच्च आध्यात्मिक वातावरणात हे अन्न सेवन करतात.

विवेकानंद आश्रमाची दिडशे एकर शेती असून, या शेतीत सेंद्रीय खतांचा वापर करून रासायनिक कीड आणि कीटकनाशके यांचा वापर टाळून केवळ नैसर्गिक पद्धतीने पिकविण्यात आलेला सकस भाजीपाला वापरण्यात येतो. त्यासाठी या शेतात ग्रीन हाऊस शेडनेटची सुविधा करण्यात आलेली आहे.
                                                                                संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८