अपु-या सिंचनाचा रब्बी पिकाला फटका


मेहकर तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असून हरभरा व गहूचा पेरा कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यात बळीराजाने हरभराच्या हंगामास सुरूवात केली असून कमी पावसामुळे  हरभराच्या उत्पादनात ५० टक्याने घट होणार असल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. रब्बी पिकाच्या पेरणीसाठी काढलेल्या कर्ज  रब्बी पिकाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे कसे फेडायचे या विचाराने तो चिंताग्रस्त  झाला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षपासून  निसर्गाच्या लहरीपणाच्या झळा शेतीक्षेत्र  व बळीराजा सहन कराव्या लागत आहे. पावसाची सरासरी कमीकमी  होत असल्यामुळे तलाव व धरणात कमी प्रमाणात जलसाठा होत असल्यामुळे त्यांचा मोठा फटका शेतीक्षेत्राला बसत आहे. धरणाचा जलसाठा कमी असल्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नाही. व अत्यल्प पावसामुळे विहिरींनी तळ गाठल्यामुळे रब्बी पिकासाठी पाणी कमी पडल्यामुळे परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्याचा रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका या पेरणी क्षेत्रावर परिणाम झाला. अपु-या सिंचनामुळें   रब्बीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होत आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी बी,खते,फवारणी व सोंगणी व काढणीचा विचार करता बळीराजाच्या हातामध्ये काहीच बाकी रक्कम शिल्लक राहत नाही.  शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचे कणा  आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतक-याच्या शेतीमाला योग्य बाजार भावा अभावी दिवसेंदिवस तो कर्जाच्या खाईत पुरता बुडत चालला असतांना यावर्षी अपु-या पावसामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात येणा-या घटमुळे तो पुरता निराश झाला आहे. 

शेतीपुरक व्यवसायाकडे वळण्याची गरज
दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला सामना करावा लागत आहे. बळीराजाने भविष्यात शेतीवर विसंबून न राहता शेतीपुरक व्यवसायाची कास धरावी. शेतीसोबत दुध व्यवसायाकडे वळल्यास शेती व्यतिरिक्त उत्पादनाचे दुसरे साधन उपलब्ध होईल. 

हंगामात मजुरीचे दरात वाढ
ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाने ग्रामीण भागात काम मिळत नसल्यामुळे कामाच्या शोधाकरीता शहरी भागाकडे धाव घेतली. ग्रामीण भागातील मजूर व कष्टकरी वर्ग शहराकडे गेल्यामुळे ग्रामीण भागात रब्बी पिकाच्या हंगामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे मजुरीच्या दारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



शिक्षण समाजाच्या विकासाचा पाया- उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ


दरवर्षी गावोगावी धार्मिक सप्ताहाचे आयोजन करून आध्यात्मावर चिंतन होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यातील संशोधनवृत्तीला व कल्पनाशक्तीला चालनामिळावी यासाठी ग्रामपातळीवरून विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय तज्ञांचे  शैक्षणिक मार्गदर्शनाचे  आयोजन करावे. शिक्षण समाजाच्या विकासाचा पाया असल्याचे विचार औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी बोलतांना काढले. मेहकर तालुक्यातील आरेगांव येथील जिल्हा परिषद शाळेला शंभर वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. 
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन , दिप प्रज्वलन व पुलवामा येथील शहिद जवानांना श्रध्दांजी अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव  होते तर प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी स्वामी दिव्यानंद,मेहकरचे तहसीलदार गरकळ,सभापती भाऊराव वानखेडे, राजेंद्र पळसकर,प्रा.आशिष रहाटे,राजेंद्र गाडेकर,सुरेश वाळुकर,संजय धांडे,समाधान साबळे,निंबाजी पांडव,सागर पाटील तथा आदि उपस्थित होते. 
पुढे बोलतांना उपजिल्हाधिकारी वायाळ म्हणाले की, शाळा ही केवळ फक्त इमारत नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार,संस्कार व मूल्याधिष्ठीत जीवन जगण्याची उर्जाकेंद्र आहे. शाळेच्या इमारतीमध्ये सर्व जाती,धर्माची मुले एकत्रितपणे ज्ञानार्जन करतात. शाळामध्ये शिक्षणासोबत आदर्श व्यक्ती बनण्याची ताकद मिळत असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दता अंभोरे यांती तर आभार राहुल डोंगरदिवे,गजानन पिंपरकर यांनी मानले.  


ध्येयप्राप्तीसाठी स्वप्नांचा पाठलाग करा.
मेहकर तालुक्यातील आरेगांव शाळेच्या शतकपूर्ती प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात गावातील प्रथम तहसिलदार व सद्या औरंगाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सोहम वायाळ यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना बोलतांना सांगीतले की, प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल करू नका. आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहा. मोठे स्वप्न बघा त्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी जिद्द,चिकाटी,परिश्रम व अभ्यासाचे नियोजन करा.ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावे असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


update news 2019


update news


रस्ता दुरुस्तीसाठी ओलांडेश्वर संस्थांचा पुढाकार


हजारो भाविकांचे अतूट श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधा ब्रम्हपूरी येथे महाशिवरात्री उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्त येतात .हिवरा आश्रम ते श्रीक्षेत्र ओलांडेश्वर  या रस्त्यावरील डांबर निघाल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.रात्रीच्या वेळी  हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर रस्त्याने दुचाकी चालविणे म्हणजे तारेवरची कसरत होय. भाविक भक्तांची रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारी हेळसांड थांबविण्यासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वरचे अध्यक्ष मंचकराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या मदतीने हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर या ३ किलोमीटर  रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा बाजूनी ५० ट्रॉली मुरमाचा भराव टाकला. ओलांडेश्वर संस्थाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास ५० हजार रुपये खर्च केला. श्रीक्षेत्र ओलांडेश्वर वर भाविकांची अतूट श्रद्धा असल्यामुळे महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक ओलांडेश्वर येथे येतात. दरम्यान भल्या सकाळी भाविक भक्त शिव पूजन व दर्शनासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे येत असतात.  नागरिकांना नाहक त्रास होत होता.  दरम्यान दुचाकी चालकांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .रस्ताला विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे कानाडोळाकेल्यामुळे रत्याची दुरावस्था दिवसेंदिवस अधिकच होत आहे. तरी या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी यावेळी भाविकंाकडून जोर धरीत आहे.   या  रस्ताची रूंदी केवळ १० फूट असल्यामुळे दुचाकी, चारचाकी चालकांना  तारेवरची कसरत करावी लागत आहे.श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थाने रस्ता दुरुस्तीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे भक्तांमध्ये आनंद झाला आहे.

गेल्या अनेक वर्षपासून हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर या रस्त्याचे डांबर निघाल्यामुळे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळणी झाली होती. ओलांडेश्वर संस्थाने पुढाकार घेऊन हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती केली.लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे जातीने लक्ष द्यावे.
 मंचकराव देशमुख, अध्यक्ष ओलांडेश्वर संस्थान 

श्रमदानासाठी तरुणाई सरसावली
हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी ओलांडेश्वर संस्थांच्या वतीने पुढाकार घेऊन ५० ट्रॉली मुरूम टाकण्यात आला. रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी दुधा गावातील राजू इटीवाड,अमोल  इटीवाड, रवि पवार, नागेश देशमुख, गोपाल इटीवाड, गोपाल गाडेकर, सचिन देशमुख, नागेश देशमुख, आकाश ठाकूर, बाळू देशमुख या तरुणांनी श्रमदानासाठी  पुढाकार घेतला.