विद्यापीठ क्रिकेट संघाच्या कॅप्टन पदी राहुल म्हस्के ची निवड



कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी व्यवस्थापन व्यवस्थापन महाविद्यालयाच्या  तीस-या वर्षात शिकणारा विद्यार्थी राहूल म्हस्के यांची डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या कॅप्टन म्हणून झाली आहे.  
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्याचे आयोजन दि. २० डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान सुरत येथे आयोजीत केले आहे.  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के यांची कॅप्टन म्हणून तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्ञानेश्वर बानोरे,गोपालसिंग राजपूत यांची संघात निवड झाली आहे. सुरत येथे  संपन्न  होणा-या  पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात सह २१ राज्यातून संघ क्रिकेट खेळण्यासाठी येणार आहेत. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रिकेटच्या संघ व्यवस्थापक म्हणून विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा.विशाल काकड यांची निवड झाली आहे. राहूल म्हस्के या विद्यार्थ्याने  या अगोदर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेत २००,४०० ८०० मीटर सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,अनुप शेवाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल
राहूल म्हस्के या विद्यार्थ्याने  या अगोदर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेत २००,४०० ८०० मीटर सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.

विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांची डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या  कॅप्टन व संघात मिळविलेले स्थान खरोखरच कौतुकास्पद व अभिनंदन करण्याजोगे आहे.

                                           संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

आधुनिक जीवनशैलीत आरोग्याची काळजी घ्या- आ.डॉ रायमूलकर



सद्याचे युग हे स्पर्धेचे धकाधकीचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे आहार विहारात खूप बदल झाले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम झाले असून त्यामुळे माणसाला अनेक आजार जडत आहे. आधुनिक जीवनशैलीत आरोग्य सांभाळा असे विचार .डॉ.संंजय रायमूलकर यांनी येथूनच जवळ असलेल्या प्रती पंढरपूर देऊळगांव माळी येथे आयोजीत मोफत आयुर्वेदीक रोग निदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना काढले.
संत जनार्धन स्वामी सदगुरू सेवाश्रम,ॠषीवेद हर्बल प्रॉडक्ट प्रा.लि. हरिव्दार,जे.एम.डी.मेडिको सव्र्हीसेस लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगांव माळी येथे भव्य मोफत आयुर्वेदीक रोग निदान शिबीराचे उदघाटन प्रसंगी गुरूवार ता.२०  ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं..सदस्य शिवप्रसाद मगर हे होते तर प्रमख पाहूणे म्हणून मेहकरचे ठाणेदार .एम प्रधान,अध्यक्ष बळीराम गिरी महाराज,विठ्ठल रूखमिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव मगर,बि.के.सुरूशे,ग्रा..सदस्य सचिन मगर,श्रीराम बळी,हभप नवले महाराज,प्रकाश महाराज,सखा पाटील,विश्वबंर भराड,डॉ.नरहरी मगर,डॉ.गजानन गि-हे,डॉ.सुजाता भराड,डॉ.कु.वर्षा बळी तथा आदींची उपस्थिती होती. या दोन दिवशीय भव्य मोफत आयुर्वेदीक शिबीराचा सुमारे ४०० ते ५०० गरजू रूग्णांनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश मगर पाटील यांनी मानले.