तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला

 विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे, अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचं दिसून आलं. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर पोहोचले आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

धैर्येशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक आहेत. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

उमेदवारीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आधी पुण्यात थेट शरद पवारांची भेट घेतली.  पंढरपूर मंगळवेढा परिसरातील भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याची शक्यता देखील या निमित्ताने वर्तवली जात आहे.

कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार?

पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा प्रचारही सुरु झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे दुसरे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. ते देखील इच्छु उमेदवार असून त्यांनी निवडणुकीसाठीची चाचपणी सुरू केली आहे. तर प्रशांत परिचारक यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. तर बिआरएस पक्षाचे भगीरथ भालके यांनी देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे आपली पावले वळवली आहे.

भाजपचे तिकिट जवळपास समाधान आवताडे यांना मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांकडे आली तरी उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेलं नाही. कारण महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके, प्रशांत परिचारक, अनिल सावंत यांचेही मोठे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणाच्या हाती तुतारी येते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

महिला व बालविकास विभागाद्वारे 236 पदांवर भरती सुरू; या उमेदवारांना मोठी संधी!

 

महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने विविध पदांसाठी एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लिपिक, स्वयंपाकी आणि काळजी वाहक यांसारख्या पदांचा समावेश आहे. 14 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, 3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. सरकारी नोकरीची संधी साधायची असेल तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. चला तर मग, आता आपण या लेखात वरील भरतीबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महिला बाल विकास विभाग भरती

भरती करणारा विभाग: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग

रिक्त पदांची संख्या: एकूण 236 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024 Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 – पदांची माहिती

जाहिरात क्रमांक: 01/2024


महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत खालील पदांसाठी भरती होणार आहे:

संरक्षण अधिकारी (गट – ब) – 02 पदे

परिविक्षा अधिकारी (गट – क) – 72 पदे

3. लघुलेखक (उच्च श्रेणी), गट – क – 01 पद

लघुलेखक (निम्न श्रेणी), गट – क – 02 पदे

वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक – 56 पदे

संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट – क – 57 पदे

वरिष्ठ काळजी वाहक, गट – ड – 04 पदे

कनिष्ठ काळजी वाहक, गट – ड – 36 पदे

स्वयंपाकी, गट – ड – 06 पदे

एकूण पदे: 236


शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria

या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक ठरणार आहे.

नोकरीचे ठिकाण | Job Place

संपूर्ण महाराष्ट्र भर या भरती अंतर्गत तुमची नियुक्ती करण्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात नोकरी करण्यासाठी सज्ज रहावे लागेल.

महत्त्वाच्या तारखा | Mahila Bal Vikas Vibhag Bharti Imprtant Dates

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024

टीप: अर्ज करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख लक्षात ठेऊन अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करण्यात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

अर्जाची पद्धत | Application Process


या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

14 ऑक्टोबर 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, त्यामुळे वेळेत अर्ज सादर करणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे.

टीप: अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा.


अर्ज प्रक्रिया कशी करावी? | Mahila Bal Vikas Vibhag Bharti How to apply?

नोंदणी करा: संकेतस्थळावर नवीन खाते उघडा किंवा आधीपासूनच सुरू असलेल्या खात्यात लॉगिन करा.

अर्ज भरा: तुमची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूकपणे भरून अर्ज पूर्ण करा.

कागदपत्रे अपलोड करा: गरजेप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करा.

अर्ज सादर करा: अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.

महत्त्वाची सूचना | Important Note


भरतीसाठी अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.

3 नोव्हेंबर 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे. अर्ज चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास रद्द केला जाऊ शकतो.


अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.

महत्त्वाच्या लिंक्स | Important Links

अधिकृत जाहिरात लवकरच उपलब्ध होईल.

  


विवेकानंद विद्या मंदिराची यशाची परंपरा कायम !

 

विवेकानंद आश्रम हे निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या आरोग्य सेवेने देश, विदेशात प्रसिध्द झालेले दुःख निवारण केंद्र आहे. त्यासोबतच ही संस्था महाराष्ट्रातील एक मोठे शैक्षणिक केंद्र बनले आहे. गुरूकुल पध्दतीचे शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा निवास हा आश्रम परिसरातच असतो. कोवळया वयात मुलांना स्वावलंबनाचे धडे मिळण्यासाठी हे वातावरण अत्यंत पोषक आहे. दर्जेदार शिक्षण,रूचकर भोजन मातृहृदयाने पुरविणारी व्यवस्था,सर्वसोयीसुविधांनी युक्त ५ मजली शालेय विद्यार्थी वसतीगृह,वसतीगृहातून होणारे सुसंस्कार वर्ग, प्रार्थना, विविध उपक्रम त्यातून मिळणारे सहजीवन सोबतच आश्रमामुळे थोरामोठयांचे ये-जा असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा लाभलेला सहवास यामुळे त्यांचे जीवन सुंदर होण्यास मदत मिळते. म्हणून या शाळेत प्रवेशासाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांची झुंबड उडते. आज या शाळेच्या दहावीचा निकाल जाहिर झाला आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून ऋतुजा रवि लोखंडे ९६.२० टक्के, श्रद्धा संतोष हिवरकर ९६ टक्के, रवि भागवत छबिले ९४.८०टक्के, कृष्णाली राजेश शेळके ९४.६० टक्के, संकेत मारोती घोरपडे ९३.८० टक्के, स्वरूपा राजेश हागोने ९३.८० टक्के, नकुल प्रदीप शेळके ९३.२० टक्के, शिवप्रसाद गजानन केणेकर ९३. टक्के, राम दयानंद थोरहाते ९२.८० टक्के, विराज विशाल परिहार ९१.८० टक्के, कृष्णा आत्मानंद थोरहाते ९०.८० टक्के  गुण मिळवून उत्तीर्ण  झाले. विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णूपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांचे सह विश्वस्त मंडळ व विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य आर.डी.पवार, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

हिंसा, व्देष व विषमतायुक्त जगाला बुध्द चिंतन हाच पर्याय - किरण डोंगरदिवे


विवेकानंद आश्रमात बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमात केले प्रतिपादन
आजच्या जगात प्रगतीच्या नावाखाली, सीमा विस्तारासाठी अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. अण्वस्त्र जग मानव आणि मानवतेच्या मुळावर उठले आहे. धर्माधर्मातील व्देष, विषमता जगाला विनाशाकडे घेवून जात असतांना भगवान बुध्दांचे जीवन व तत्‍वज्ञानाचे चिंतन हाच श्रेष्ठ पर्याय जगासमोर शिल्लक असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द कवी किरण डोंगरदिवे यांनी विवेकानंद आश्रमात आयोजित बुध्द पौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले. प्रज्ञावंतांनी शीलवान असावे व करूणाबुध्दी धारण करावी असे करणे ही मानवाची अधिकत्‍तम गुणवत्‍ता आहे. स्वामी विवेकानंदांनी  भगवान बुध्दांकडून करूणेचा स्वीकार केला म्हणूनच स्वामी विवेकानंदांचे हृदय दीन, दुःखी, पीडीत महिला यांच्यासाठी कासावीस झाले व भारतीयांसाठी ते मोठे कार्य करू शकले.  त्‍यांनी धर्मविषयक नवी संकल्पना  मांडली, त्‍यात मानवसेवेलाच महत्‍व दिले. त्‍यांच्या विचारांचा तोच धागा पकडून प. पू. शुकदास महाराजांनी मानवाला केंद्रस्थानी मानून त्‍याची सेवा केली असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतिमेचे पूजन व  पंचशील ग्रहण करण्यात आले.  सज्जनसिंह राजपूत यांनी बुध्द वंदना सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी हे होते.  प्रमुख उपस्थितीत साहित्‍यिक शिवाजीराव घोंगडे, अशोक थोरहाते, प्राचार्य आर. डी. पवार हे होते. शिवाजीराव घोंगडे यांनी प. पू. शुकदास महाराजांनी गावकुसा बाहेर राहणाऱ्यांना, कष्टकरी, श्रमजीवी, वंचितांना आश्रमात समावून घेतले. त्‍यांनी कोणताच भेद बाळगला नाही. मानव कल्याणासाठी अहोरात्र जीवन जगून विवेकानंद आश्रम सारखी सुंदर संस्था मानव सेवेसाठी निर्माण केली. महाराजांच्या जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेले तत्‍व आढळून येतात असे विचार त्‍यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव हिवाळे यांनी केले. यावेळी संतोष गोरे, पुरूषोत्‍तम आकोटकर, अशोक गिऱ्हे, पंढरीनाथ शेळके, पत्रकार संतोष थोरहाते, राजेश रौंदळकर, मधुकर वानखेडे, बी.टी.सरकटे, जी.डी. तायडे, नितीन इंगळे,संजय कंकाळ,समाधान बनसोडे,भिकेश इंगळे, विश्वजीत गवई,माणिक गवई,अनिल वानखेडे, पोलीस पाटील रवि घोंगडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य आर.डी.पवार यांनी केले.

विवेकानंद आश्रमात महात्‍मा बसवेश्वर जयंती साजरी

 थोर समाज सुधारक तसचे वर्णभेद,जातीभेद या विषमतावादी विचारांना मानवी जीवनातून हद्दपार करण्यासाठी चळवळ उभी करणारे महात्‍मा बसवेश्वर. त्‍यांची जयंती विवेकानंद आश्रमात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुप्रसिध्द गायक सज्जनसिंह राजपूत, वादक निलेश थोरहाते यांच्या भक्तीगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्राचार्य आर डी पवार आपल्या भाषणात म्हणाले, महात्‍मा बसवेश्वरांच्या विचारात लोकशाही मूल्यांची तत्‍वे होती. त्‍यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीयांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग, जातीप्रथा निर्मूलन, आंतरजातीय विवाह प्रोत्‍साहन या समाजाला एकसंघ ठेवणाऱ्या मानवतावादी विचारांचा प्रसार केला. बसवेश्वरांनी अनुभव मंडप या संकल्पनेतून आधुनिक राज्य व्यवस्थेचे प्रारूप निर्माण केले. कर्मप्रधान जीवनशैली स्वीकारून परमेश्वर प्राप्तीचा संदेश दिला. त्‍यानंतर सौ.वनिता सांबपूरे यांनी महात्‍मा बसवेश्वरांच्या जीवनावरील दीर्घ काव्य सादर केले. सत्‍पुरूषांचे विचार कालातीत असतात. एक हजार वर्षापूर्वी बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक क्रांतीची गरज आजच्या नवसमाज रचनेला आवश्यक भासत आहे. महात्‍मा बसवेश्वर ते स्वामी विवेकानंद आणि प.पू.शुकदास महाराज हा विचारांचा त्रिकोण कर्नाटक,बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत प्रवाहीत झाला. प.पू.शुकदास महाराजांनी स्वीकारलेला कर्मयोग बसवेश्वरांच्या शिकवणूकीतून त्‍यांना प्राप्त झाल्याचे संतोष गोरे यांनी सांगितले. कृषि सहाय्यक यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अशोक थोरहाते, वसंतआप्पा सांबपूरे, बेलाप्पा धाडकर, डॉ.जगदीश सांबपूरे, शिवदास सांबपूरे, सागर उर्किडे, अनिल बोरकर, विलास तामस्कर, संजय तोडकर,  सातरकर आप्पाजी, मनोज डोंगरे,डॉ.सुनिल देशमाने, सतिष धाडकर, डॉ. तुपकरी, नागेश तोडकर, योगेश तोडकर, डॉ.तेजस सांबपूरे, श्याम तामस्कर, इत्‍यादी  मान्यवर उपस्थित होते.