बालसंस्कार शिबीरातून आदर्श व्यक्तीमत्वाची पायाभरणी-हभप येवले शात्री महाराज

महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवन आनंददायी होते. महापुरूषांच्या विचारात जीवनात आमुग्र बदल करण्याची अद्भूत शक्ती आहे. बालसंस्कार शिबीरातून आदर्श व्यक्तीमत्वाची पायाभरणी होत असल्याचे विचार हभप निवृत्तीनाथ येवले शास्त्री महाराज यांनी बालसंस्कार शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाने आयोजित २१ दिवशीय बालसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी शनिवार ता. रोजी ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे  तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,योगशिक्षक नाना इंगळे,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,रणजीत जाधव,विजय गोरे ,प्रतिक्षा डाखोरे तथा आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांना साचेबंद जीवनशैलीतून बाजूला काढून त्यांच्यातील सुप्तगुणांना संधी मिळण्यासाठी संस्कार शिबीराचा मोठा फायदा होतो. मुलांच्या हातातील मोबाईल आणि व्हीडीओ गेम दूर करण्यासाठी त्याला मैदानाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. ही पिढी बौध्दीक दृष्टया अत्यंत तेज असून संस्काराचे बीजारोपन झाल्यास उत्तम व्यक्तीमत्व होवून ते यशस्वी होवू शकतात असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना काढले. या शिबीरातून विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे प्रशिक्षण,संगीत,अभिनय इत्यादी कलांचा परिचय करून देण्यात येणार असून सकाळी वाजता सुरू होणा-या शिबीरात योग प्राणायामापासून कुस्ती मल्लखांब,हस्ताक्षर सुधार,गीतापाठ इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे. पहिल्याच दिवशी शिबीरात ७० मुलांची उपस्थिती असून निवासी विद्याथ्र्यांची उत्तम व्यवस्था केली जाणार असल्याचे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य  पंढरीनाथ शेळके तर आभार प्राचार्य  निवृत्ती शिदे यांनी मानले.

संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



विवेकानंद आश्रमात बालसंस्कार शिबीराचे आयोजन


शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विवेकानंद आश्रमात उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा दि. जून पासून ते २१ जून पर्यंत या बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील विविध सुप्तगुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने अशी शिबीरे महत्वाची ठरतात. शालेय कालखंडात अभ्यास, शिकवणी, गृहपाठ या उपक्रमांना विद्यार्थी कंटाळलेले असतात. त्या साचेबंध्द जीवनशैलीत मनाप्रमाणे खेळणे, बागडणे स्वतःमधील विविध कलागुणांना वाव मिळण्याची शक्यता कमी असते. शालेतून घरी आलेली मुले मोबाईल किंवा  संगणकात डोके घालून बसलेली दिसतात. त्यांच्या हातातील मोबाईल काढून टाकण्यासाठी त्यांना मैदानावर शारीरीक कसरतीचे धडे देण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. या शिबीरात मुला मुलींची निवासी व्यवस्था करण्यात आली असून दि. जूनला सकाळी ११ वाजता या शिबीराचे उदघाटन संत साहित्याचे अभ्यासक प्रख्यात्य वक्ते विठ्ठल रूखमिनी देवस्थान पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी राहणार आहेत. या शिबीराचा जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी लाभ घेण्याचे आवाहन  आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

चुमुकल्यांच्या सुप्त कलागुणांना  संधी 
सकाळी  ते .३० रनिंगयोग प्राणायमप्रार्थना प्रख्यात योगशिक्षक नाना इंगळेघनश्याम गोरे हे घेणार आहे.३० ते .३० प्रातविधी  तयार होणे.३० ते .३० सुसंस्कार वर्ग.३० ते .३० क्रीडा प्रशिक्षक विजय गोरे यांचे मॅटवरील कुस्ती  मल्लखांबाचे बेसिक.३० ते १० जेवन१० ते ११ इंग्रजी संभाषण वर्ग११ ते  रेणू महामुने,भूषण महामुने यांचे नृत्य गायन  अभिनय कौशल्य  ते .३० अल्पोहार.३० ते  विश्रांती ते .३० मान्यवरांचे कथाकथन,  विद्यार्थ्यांना व्यासपीठावर प्रदर्शन करण्याची खुली संधी .३० ते  लाठीकाठीलेझीमतलवारबाजीचे प्रशिक्षणसायंकाळी  ते   जेवन ते  हरीपाठगीतापाठहनुमान चालीसा पठनअनुभूती अभंग   पठन  सामूदायीक प्रार्थना हभप  येवले शास्त्री  थुट्टे  शास्त्री यांचे  चिंतन


संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळा तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर विज्ञान शाखेमध्ये कु.वैष्णवी संजय रहाटे,दत्तात्रय कारभारी वाघ,कु.संचिता संजय जटाळे तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला असून यामध्ये कृष्णा चंदन पिसाळ,कु.मीना मधुकर जवंजाळ,कु.माया साहेबराव जाधव यांनी यश संपादन केले आहे. वरील दोन्ही शाखांमधून ८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ६२ विद्यार्थी  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान व कला शाखांचा निकाल अनुक्रमे विज्ञान शाखा १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला आहे. तर विवेकानंद व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९३.५४ टक्के लागला आहे. इयत्ता बारावीच्या सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे ,आत्मानंद थोरहाते,विष्णुपंत कुलवंत,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास भिसडे,उपप्राचार्य अशोक गि-हे,पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम जामकर तसेच ज्युनिअर कॉलजच्या सर्व प्राध्यापकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक   करून अभिनंदन केले आहे.