नदीजोड प्रकल्पाने मिटणार २२ गावाचा पाण्याचा प्रश्न !


गेल्या काही वर्षात ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्रात कमालीचा बदल होत आहे. पावसाची कमी होत जाणारी सरासरी हा सुध्दा चिंतेचा विषय बनला आहे. याचा फटका जिल्ह्यातील जलप्रकल्पाला सुध्दा बसत आहे. एकेकीकडे पेनटाकली पूर्ण भरला तर कोराडी प्रकल्प कोरडा आहेदि.११ १२ सप्टेंबरला पेनटाकळी प्रकल्पाचे दरवाजे ३० सेमी उघडले त्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेकडो हेक्टर पिकाची नासडी होवून जमीनी खरडून गेल्या होत्या मात्र याउलट कोराडी असून कोरडा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा, पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत दिसून येत आहे. याकरीता पेनटाकळी धरणातील वाहून जाणारे पाणी दोन किलोमीटरच्या बोगद्यातून गजरखेड येथील महादेवाच्या खो-यात सोडल्यास ते कोराडी धरणात पोहोचू शकते. जलसंपदा विभागाने हा नदीजोड प्रकल्प हाती घ्यावा मेहकरसह २२ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सोडावा, अशी मागणी परिसरातील नागरीकामधून आता जोर धरू लागली आहे. नैसर्गिक गुरूत्वाकर्षणानेच हे पाणी दुष्काळग्रस्त कोराडी धरणात पोहोचणार असल्याने हा प्रकल्प कमी खर्चात पूर्ण होईल. आज रोजी दोन किलोमीटर अंतरावर पाणीच पाणी तर कोराडी धरण कोरडे, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली आहे. या नदीजोड प्रकल्पास जिल्हयातील आजी-माजी नेत्यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. यापूर्वी २००८ मध्ये विवेकानंद आश्रमाचे संस्थापक पू. शुकदास महाराज यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. पेनटाकळी धरणात पूरस्थिती निर्माण होत असल्याने पिकांची नासाडी होते शेतजमिनीचा खराबा होतो. शासनाला या नुकसानीपोटी कोट्यवधीची नुकसान भरपाई द्यावी लागते. हा नदीजोड प्रकल्प या नुकसान भरपाईपेक्षाही कमी रकमेच्या खर्चात पूर्ण होईल. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयेही वाचतील.

जलसंपदाने नदीजोड प्रकल्पासाठी घ्यावा पुढाकार
दि.११ १२ सप्टेंबरला पेनटाकळी प्रकल्पाचे दरवाजे ३० सेमी उघडले त्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेकडो हेक्टर पिकाची नासडी होवून जमीनी खरडून गेल्या होत्या मात्र याउलट कोराडी असून कोरडा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा, पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत दिसून येत आहे. याकरीता पेनटाकळी धरणातील वाहून जाणारे पाणी दोन किलोमीटरच्या बोगद्यातून गजरखेड येथील महादेवाच्या खो-यात सोडल्यास ते कोराडी धरणात पोहोचू शकते. जलसंपदा विभागाने हा नदीजोड प्रकल्प हाती घ्यावा.

दुष्काळाच्या सावटाला बसेल आळा
निसर्गाच्या असमतोलाचा दिवसेंदिवस पावसाची सरासरी कमी होत असून सार्वत्रिक पावसाचे प्रमाण सुध्दा कमी झाले त्याचा फटाक जिल्ह्यातील जलप्रकल्पाला बसत असून काही जलप्रकल्प शंभर टक्के भरतात तर काही कोरडे. मात्र पेनटाकळीचे वाहून जाणारे पाणी कोराडी धरणात नदीजोड प्रकल्पाव्दारे जोडल्यास या परिसरातील सिंचनाचे क्षेत्र समृध्द होवून दुष्काळाच्या सावटाला आळा बसेल.


पावसाळयात पेनटाकळी धरणाचे ओव्हरफ्लोचे  वाहून जाणारे पूरस्थिती निर्माण करणारे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे कोराडी धरणात सोडण्यात यावे, अशी संकल्पना २००६ मध्ये या परिसराच्या विकासाची दुरदृष्टी असलेले कर्मयोगी संत .पू. शुकदास महाराजांनी ती पूर्णत्वास येणे काळाची गरज आहे. हा नदीजोड प्रकल्प झाल्यास दुष्काळाचे सावट दुर होवून सिंचन क्षेत्राला लाभ होईल.
संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

जेष्ठ नागरीकांना कायद्याचे संरक्षण- जिल्हा न्यायधीश सय्यद


जेष्ठ नागरीक ही देशाची संपत्ती आहे. त्यांचा अनुभव, जीवन विषयक दृष्टीकोन कुटूंबाच्या समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरणारा असतो. परंतु काही मुले आपल्या आईवडीलांचा सांभाळ करतांना दिसत नाही. त्यामुळे -याच जेष्ठ नागरीकांना वृध्दाश्रमाची वाट धरावी लागत आहे. आई वडीलांचा सांभाळ करणा-या मुलांना आता कायदाचा धाक निर्माण झाला आहे. २००७ च्या कायदयानुसार मुलांना आई वडीलांचा सांभाळ करणे हे मुलाचे कर्तव्य आहे. जेष्ठ नागरीकांसाठी कायदयात अनेक तरतूदी केलेल्या आहेत. कायदा तुमच्या पाठीशी आहे. जेष्ठ नागरीकांनी या कायदयांचा आधार घेवून सन्मानाने जगावे असे उदगार जिल्हा विधी प्राधीकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायधीश वरीष्ठस्तर बुलडाणा साजिद सय्यद यांनी विवेकानंद आश्रमात वृध्दाश्रमाला भेटी प्रसंगी काढले. वृध्दांनाची व्यवस्था त्यांना दिल्या जाणा-या सोयी सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा वकील संघाचे श्रीकांत मारोडकर वैद्यकिय अधिकारी प्रमोद टाले हे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मान्यवरांनी आश्रम परिसराला भेट देवून संस्थेव्दारा सुरू असलेल्या सेवा उपक्रमांची पाहणी केली. कार्यक्रमाची सुरूवात अभय मासोदकर सज्जनसिंग राजपूत यांनी सादर केलेल्या गीतांनी झाली. निष्काम कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी दीन दुःखी,वंचितच्या सेवेसाठी विवेकानंद  आश्रमाची स्थापना केली असून त्यांचे संपूर्ण जीवन मानव सेवेसाठी समर्पित केले. आजही त्यांच्या प्रेरणेने निराधार वृध्दांची सेवा करण्याचे काम विवेकानंद आश्रम करीत असल्याचे आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रास्ताविकात सांगीतले. जिल्हा वकील संघाचे मारोडकर यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्का बद्दल असलेल्या कायदयाची माहिती तर डॉ.प्रमोद टाले यांनी वृध्दांचे आजार त्यांनी घ्यावायचा आहार याबद्दल माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सुज्ञ नागरीक संघाचे शिवाजीराव घोंगडे,आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  ज्ञानेश्वर तिजारे, बेलाप्पा धाडकर, अधिक्षक मनोज डोंगर, विजय ठोकरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाला वृध्दाश्रमातील सर्व वृध्द  स्त्री पुरूष उपस्थित होते.

विवेकानंद आश्रमात वृध्दांशी साधला संवाद
दिवाणी न्यायधीश वरीष्ठस्तर बुलडाणा साजिद सय्यद यांनी विवेकानंद आश्रमात वृध्दाश्रमाला भेटी प्रसंगी काढले.वृध्दांनाची व्यवस्था त्यांना दिल्या जाणा-या सोयी सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी विवेकानंद आश्रमातील वृद्धांशी संवाद साधला.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८