Responsive Ads Here

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी- प्राचार्य के.डी.पाटील

आजच्या प्रगत भारतात ब-याच आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समाजाने आरोग्याच्या बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. आरोग्य बाबतच्या माहितीच्या अभावामुळे अनेक आजारात वाढ होते. अनुवांशिकतेवर माहिती देण्यासाठी व प्राथमिक स्थळावर काळजी घेणे व जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी पडत  असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित अनुवांशिक अभियांत्रिकी विषयावर प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु. समता कस्तुरेप्रा.कु.मधुरा सातपुते यांच्या एक दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी बुधवारी ता.५ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  के.डी.पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ येथील प्रा.जी.के.मुंढे उपस्थित होते.
उदघाटन समारंभा नंतर तांत्रिक सत्रामध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी यावर बीएससी च्या विद्याथी विद्यार्थीनींना प्रा.जी.के.मुंढे यांनी माहिती व प्रात्यक्षिक केले.या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.यावेळी प्रा.डॉ.राम धमकप्रा.डॉ.गौतम जयगावकर,प्रा.गजानन गायकवाडप्रा.किशोर गवईप्रा.योगेश काळेप्रा.सौरभ आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कु.मनिषा कुडके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. कु.समता कस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कु.मधुरा सातपुते यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा